संत्रिका विभागातील पुरोहितांच्या स्वविकासासाठी स्वाध्याय हे सत्र गेल्या आठवड्यात घेतले होते. त्या सत्रासाठी तयार केलेले एक AI संकल्पना चित्र शेअर करत आहे
सस्नेह नमस्कार , " अनुभव हा आपला एकमेव खरा गुरू आहे. आपल्या संपूर्ण ज्ञानाची भक्कम पायाभरणी ही केवळ अनुभवावरच उभी असते." — स्वामी विवेकानंद विद्यार्थी ज्या परिसरात राहतो , तिथले वेगवेगळे घटक आणि घडणाऱ्या घटना त्याच्या ' अनुभवविश्वाला ' थेट स्पर्श करत असतात. या बाह्य जगाला आणि घटनांना जाणून घेण्याचे पहिले प्रवेशद्वार म्हणजे आपली ' ज्ञानेंद्रिये ' होत. सूक्ष्म, तरल आणि प्रगल्भ ' निरीक्षणाने ' हे द्वार उघडते. ज्ञानेंद्रियांच्या तरलतेनुसार परिसरातील हे सर्व घटक आणि घटना विद्यार्थ्यांच्या अनुभवकक्षेत येत असतात. वास्तविक पाहता , ' चेतना ' म्हणजे जाणिवेची , प्रत्यक्ष अनुभवण्याची आणि संवेदनशील प्रतिसाद देण्याची क्षमता होय. ही चेतना मन , मेंदू आणि ज्ञानेंद्रिये यांना एकत्रितपणे कार्यशील बनवते. ज्ञानेंद्रिये बाह्य जगातील विविध ' चेतक ' म्हणजेच दृश्य , ध्वनी , स्पर्श , वास आणि चव यांच्या माध्यमातून ' संवेदना ' ग्रहण करतात. चेतना या कोरड्या संवेदनांना अर्थ प्राप्त करून देते. थोडक्यात सांगायचे तर , संवेदना केवळ माहिती पुरवत...