Skip to main content

असती का ऐसे कुणी....!!

 असती का ऐसे कुणी

गुरूपौर्णिमेच्या दिवशी सकाळी व्हॉट्सअपवर संदेश यायला सुरुवात झाली. त्यातील काही संदेश गुरूची महती सांगणारे होते, काही गुरूवंदना करणारे होते तर काही शुभेच्छा संदेश होते.

यातील शुभेच्छा संदेशांना काय उत्तर द्यायचे खरंतर प्रश्नच पडतो.

कोणी कोणाला शुभेच्छा द्यायच्या आणि का द्यायच्या ?

प्रत्येक विशेष दिनाला फक्त शुभेच्छाच द्याव्यात?

की आपल्याला विशेषदिनाचा संदेश फक्त शुभेच्छाच देऊन व्यक्त करता येतो !!

असे अनेक प्रश्न मनात घेऊन त्यादिवशी प्रबोधिनीत आलो. आल्यावर थोड्या वेळाने अग्रणी विद्यार्थी ( इ १० वीतील विद्यार्थी नेते ) भेटायला आले. त्यांनी सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गात गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम योजला होत. त्यासाठी पाहुणा वक्ता म्हणून निमंत्रित केले.

दुपारी सकाळी पडलेले  प्रश्न मनात घेऊनच कार्यक्रमात गेलो. प्रबोधिनीत प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात पद्याने (गीताने) होते. गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सुरुवात ‘असती का ऐसे कुणी’  या गीताने झाली. या गीताच्या ध्रुवपदात परत परत एक प्रश्न विचारला आहे

असती का ऐसे कुणी ?

असती का ऐसे कुणी ?

कार्यक्रमाची प्रस्तावना सुरू असतानाच सकाळच्या प्रश्नांची  उत्तरे  मिळायला सुरुवात झाली !

खरंतर गुरूपौर्णिमेच्या दिवशी 

शिष्याने स्वतःच स्वतःला प्रश्न करायचा आहे ;

असती का ऐसे कुणी ?

जर हा प्रश्न मनात आला तरच

शिकण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण होईल.

जर हा प्रश्न मनात आला तरच

ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक आणि योग्य मार्गदर्शक शोधण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.

जर हा प्रश्न मनात आला तरच

शिकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.

हे काय आहे, ते काय आहे,..

 .. याबद्दलची माहिती सांगू शकेल असे कोणी असतील का ?

 ..  याचा अर्थ  सांगू शकतील असे कोणी असतील का ?

 ..  याचा अर्थ कसा शोधायचा हे सांगू शकतील असे कोणी असतील का ?

हे कुठे  आहे, ते कुठे आहे, .. 

  .. ते दाखवू शकतील असे कोणी असतील का ?

हे कसे करायचे, ते कसे करायचे, .. 

 .. ते करून दाखवू शकतील असे कोणी असतील का ?

 .. ते शिकवू शकतील असे कोणी असतील का ?

हे कशामुळे आहे ते कशामुळे आहे, .. 

 .. या मागचे सूत्र .. यामागचे दडलेले तत्त्व सापडले आहे असे कोणी असतील का ?

हे काय आहे, ते काय आहे, .. 

 .. त्याचा वेगळा अर्थ शोधण्यासाठी प्रयत्न करणारे;

 .. त्याचा वेगळा अर्थ शोधला आहे असे कोणी असतील का ?

 .. सापडलेल्या अर्थाचा जगण्यासाठी वापर कसा करायचा हे जमले आहे असे कोणी असतील का ?

 .. त्याचा जगण्यासाठी वापर कसा करायचा हे शिकवू शकतील असे कोणी असतील का ?

हे काय आहे, ते काय आहे, .. 

 .. त्याप्रमाणे जीवन जगणारे कोणी असतील का ?

 ..  आणि त्याप्रमाणे जीवन कसे जगायचे याचा दृष्टीकोन देणारे  कोणी असतील का ?

हे काय आहे,ते काय आहे, .. 

 .. ते सांगणारा कुणी भेटला नाही तर परतपरत प्रयत्न करून .. 

 .. तुलाच त्याचा  शोधायचे आहे याची जाणीव करून देणारे कोणी असतील का ?

हे काय आहे, ते काय आहे,

हे कुठे  आहे, ते कुठे आहे,

हे का आहे, ते  का आहे,

हे कशामुळे आहे, ते कशामुळे आहे,

हे कसे करायचे, ते कसे करायचे,

याची जाणीव करून देणारा दुसरातिसरा कोणी नसून

तो मीच, मीच आहे !!

गुरूपौर्णिमेच्या दिवशी शिष्याने स्वतःच स्वतःला  प्रश्न करायचा आहे

असती का ऐसे कुणी ?

भारतीय शिक्षण परंपरेत शिक्षण हे केंद्रस्थानी असून 

विद्यार्थी हे ज्ञान परंपरेचे पूर्वरूप तर आचार्य उत्तररूप मानले आहे.

पूर्वरूपाला उत्तररूपात  स्वतःला पूर्णपणे विकसित करायचे असेल, प्रकट करायचे असेल 

तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी स्वतःच  स्वतःला  असती का ऐसे कुणी ?हा प्रश्न विचारला 

तर ती गुरूचा शोध घेण्याची अर्थात ज्ञानपरंपरेचा पाईक होण्याची सुरुवात असेल. 

असा गुरु शोधता आला

    त्याच्याकडून ज्ञान मिळवता आले

        ते ज्ञान वापरण्याचे शहाणपण गुरूच्या सानिध्यात  स्वतःमध्ये विकसित करता आले 

तर आजच्या शिक्षक दिनी शिक्षकांना फक्त शुभेच्छा न देताशिक्षकांचे फक्त अभिनंदन न करता                                त्यांनी आपल्याला या ज्ञानपरंपरेचे पाईक बनवले

            यासाठी शिक्षकांबद्दल कृतज्ञ राहूया ! कृतज्ञता व्यक्त करूया !!   

प्रशांत दिवेकर, ज्ञान प्रबोधिनी, पुणे 

गुरुपौर्णिमा अर्थात ज्ञानाच्या परंपरांचे पाईक होण्याचा दिवस

( वरील लेख वाचण्यासाठी क्लिक करा ) 



Comments

  1. समर्पक🙏

    ReplyDelete
  2. समर्पक उद्बोधन

    ReplyDelete
  3. चिंतनशील उद् बोधन

    ReplyDelete
  4. शिक्षक, विद्यार्थी तथा संस्था चालक यांच्या साठी विचार प्रवर्तक लेख.

    ReplyDelete
  5. शिक्षण प्रक्रियेचा कृतिशील आयाम दाखवणारा लेख.
    छान मांडणी.

    ReplyDelete
  6. सर, नेहमीच विचारप्रवर्तक लेख लिहिता. आत्मपरीक्षण करण्यास उद्युक्त करणारे लेख. धन्यवाद

    ReplyDelete
  7. 'असती का ऐसे कुणी ' असा शोध घेता घेता आपण स्वतः कसे असू चा मार्ग सापडत जाईल

    ReplyDelete
  8. अध्यापक म्हणून घडताना आपले लेख नेहमीच आत्मपरीक्षण करावयास लावतात. हा लेख सुद्धा असा स्वतःचा शोध घ्यायला लावणारा आहे.

    ReplyDelete
  9. अप्रतिम लेख 👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Nation in Image: Symbols that Shape Nations

                                                          Symbols that Shape Nations This activity introduces students to how nations use visual symbols and personifications to express identity, unity, and political values. By examining global examples and comparing them with Abanindranath Tagore’s Bharat Mata, learners explore how imagery shapes nationalism and deepen their understanding of the Bharatiya concept of Rāṣṭra. Identify images and by using references complete the table   (Support Independent Learning, Comparison & analysis) 2.  Compare the above images with Abanindranath Tagore’s image of Bharat Mata. How does it reflect Indian values? (Analysis & synthesis) 3.  How does the practice of personifying nations—often through female figures—shape our understandin...

आ. कै. उषाताईंबद्दल .....

  आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये   एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल ,   थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी   प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव , उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , " आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक , सहली , शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत   आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा. त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलाप...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...