Skip to main content

ओळख एका गर्दभारण्याची...

ओळख एका गर्दभारण्याची...        

            वाई गाव आणि गाढवांची विशेष आठवण आहे. हॉही... हॉही.. करत पळणाऱ्या गाढवाची लाथ खायची का गटारात पडायचे  अशा संभ्रमात अनेकदा रस्त्यात गटाराच्याकडेला अंग चोरून उभे राहावे लागायचे.

आमचे घर नदीच्या कडेला होते त्यामुळे नदीतून वाळू काढून, ती चाळून मग गाढवांवर लादून गावात घेवून जाणारे वाळूवाले हे तर खिडकीच्या चौकटीतून दिसणारे रोजचेच दृश्य होते.

या सगळ्याची आठवण झाली कारण दोन दिवस संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी, जि. नांदेड याच्या ‘डाँकेश्वर’ केंद्रातील अतिथी गृहात निवासाला होतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्या परिसरात गाढवांचे अभयक्षेत्र म्हणून ‘धर्मा गाढवांचे अभयारण्य (Dharma Donkey Santuary )’ उपक्रम राबवला जातो.  

आजही गावांमध्ये गाढव  शेतमाल, बांधकाम साहित्य इत्यादींच्या वाहतुकीसाठी उपयोगात असलेला प्रमुख प्राणी आहे.  तरी देखील जगात जवळजवळ सर्वत्र, गाढव हा सर्वात दुर्लक्षित प्राणी आहे. गाढव सर्वात उपयुक्त प्राणी असूनही, त्यांचा मालक पाळीव जनावरांप्रमाणे त्यांचा सांभाळ करत नाहीत.  त्यांचा आहार, त्यांचे आरोग्य यांची योग्य काळजी घेवून त्यांची निगा राखत नाही.  अनेकदा त्यांचा गैरवापर देखील केला जातो. गाढवांच्या दुर्दशेचा विचार करून "धर्मा गाढव अभयारण्य" स्थापन करण्यात आले. गाढव अभयारण्य प्रकल्पाची सुरुवात श्री.रतिलाल आणि मुळच्या अमेरिकन असलेल्या श्रीमती बोनी शाह यांच्या कल्पनेतून झाली. १२ जानेवारी २००० रोजी  पर्यावरणवादी कार्यकर्त्या सुश्री मेनका गाधी यांच्या शुभ हस्ते या अभयारण्याचे उद्घाटन झाले.

गाढवांसाठीच्या या अभयक्षेत्रात  शिशु, वृद्ध, जखमी, गर्भवती आणि आजारी गाढवांना निवारा आणि वैद्यकीय सेवा दिली जात होती. गाढवांच्या मालकांसाठी गाढवांचे आरोग्य, आहार, रोग याबद्दल जागरुकता निर्माण करणारे कार्यक्रम योजले जात. गाढवांसाठी लसीकरणाची मोहीम योजण्यात येत असे.

एसएसएम ब्रूक हॉस्पिटल, यूके आणि ब्लू क्रॉस ऑफ हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षातून दोनदा धर्मा गाढव अभयक्षेत्रामध्ये लसीकरण आणि जंतनाशक कार्यक्रम आयोजित केले जात असत. सगरोळी, मुखेड, नायगाव, अतकली आणि कोंडलवाडी येथे लसीकरण शिबीर योजली जात. वर्षातून दोनदा आयोजित करण्यात येणाऱ्या या आरोग्य छावण्यांमध्ये  सुमारे १०,०००   गाढवांवर उपचार आणि लसीकरण केले जात असे

आज धर्मा गाढव अभयारण्यात  गाढवांसाठी निवारा उपलब्ध नसला तरी संस्कृती संवर्धन मंडळाद्वारे गाढवांच्या आरोग्य तपासणीची शिबिरे योजली जातात. अशा शिबिरात लसीकरणासह, गाढवांच्या आजारांचे निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया देखील करण्यात येतात.

Donkey Clinic

श्रीमती बोनी शहा जन्माने परदेशी होत्या पण या कामासाठी त्या सगरोळी राहायला येत असतं. समाजात गाढवे आणि इतर प्राण्यांसाठी करुणेची भावना निर्माण करण्यासाठी आणि लोकांना प्राण्यांविषयी  त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी त्या शिबिरे घेत असतं. गाढवांची चित्र असलेली खुंटाळी, भित्तीचित्रे, कानातील डूल अशा अनेक गोष्टी त्यांनी प्रचारासाठी तयार करून घेतल्या होत्या. लसीकरण कार्यक्रमाच्या दिवशी लसीकरणासाठी आलेल्या गाढवांना गरम गरम पाण्याने अंघोळ करण्याचे भाग्य देखील मिळत असे.

एकनाथ महाराजांची तहानलेल्या गाढवाला पाणी पाजल्याची गोष्ट ऐकली होती पण गाढवाची सेवा करणाऱ्यांची गोष्ट पहिल्यांदाच ऐकायला, पहायला मिळाली. नाहीतर माणसांच्या लेखी वाहतुकीचे काम करून घेतल्यावर गाढव म्हणजे उकिरडा फुंकणारा प्राणी !

प्रशांत दिवेकर 

ज्ञान प्रबोधिनी, पुणे  






Comments

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

सहपुस्तक चाचणी

  सहपुस्तक चाचणी                मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे ; दूरचित्रवाणीवर दहावी , बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या , चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो ? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी... ? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात , स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात , पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी... ?              माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले , ' अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका. ' मी विचारले , का ? काय झाले ? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्या...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...