Skip to main content

ओळख एका गर्दभारण्याची...

ओळख एका गर्दभारण्याची...        

            वाई गाव आणि गाढवांची विशेष आठवण आहे. हॉही... हॉही.. करत पळणाऱ्या गाढवाची लाथ खायची का गटारात पडायचे  अशा संभ्रमात अनेकदा रस्त्यात गटाराच्याकडेला अंग चोरून उभे राहावे लागायचे.

आमचे घर नदीच्या कडेला होते त्यामुळे नदीतून वाळू काढून, ती चाळून मग गाढवांवर लादून गावात घेवून जाणारे वाळूवाले हे तर खिडकीच्या चौकटीतून दिसणारे रोजचेच दृश्य होते.

या सगळ्याची आठवण झाली कारण दोन दिवस संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी, जि. नांदेड याच्या ‘डाँकेश्वर’ केंद्रातील अतिथी गृहात निवासाला होतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्या परिसरात गाढवांचे अभयक्षेत्र म्हणून ‘धर्मा गाढवांचे अभयारण्य (Dharma Donkey Santuary )’ उपक्रम राबवला जातो.  

आजही गावांमध्ये गाढव  शेतमाल, बांधकाम साहित्य इत्यादींच्या वाहतुकीसाठी उपयोगात असलेला प्रमुख प्राणी आहे.  तरी देखील जगात जवळजवळ सर्वत्र, गाढव हा सर्वात दुर्लक्षित प्राणी आहे. गाढव सर्वात उपयुक्त प्राणी असूनही, त्यांचा मालक पाळीव जनावरांप्रमाणे त्यांचा सांभाळ करत नाहीत.  त्यांचा आहार, त्यांचे आरोग्य यांची योग्य काळजी घेवून त्यांची निगा राखत नाही.  अनेकदा त्यांचा गैरवापर देखील केला जातो. गाढवांच्या दुर्दशेचा विचार करून "धर्मा गाढव अभयारण्य" स्थापन करण्यात आले. गाढव अभयारण्य प्रकल्पाची सुरुवात श्री.रतिलाल आणि मुळच्या अमेरिकन असलेल्या श्रीमती बोनी शाह यांच्या कल्पनेतून झाली. १२ जानेवारी २००० रोजी  पर्यावरणवादी कार्यकर्त्या सुश्री मेनका गाधी यांच्या शुभ हस्ते या अभयारण्याचे उद्घाटन झाले.

गाढवांसाठीच्या या अभयक्षेत्रात  शिशु, वृद्ध, जखमी, गर्भवती आणि आजारी गाढवांना निवारा आणि वैद्यकीय सेवा दिली जात होती. गाढवांच्या मालकांसाठी गाढवांचे आरोग्य, आहार, रोग याबद्दल जागरुकता निर्माण करणारे कार्यक्रम योजले जात. गाढवांसाठी लसीकरणाची मोहीम योजण्यात येत असे.

एसएसएम ब्रूक हॉस्पिटल, यूके आणि ब्लू क्रॉस ऑफ हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षातून दोनदा धर्मा गाढव अभयक्षेत्रामध्ये लसीकरण आणि जंतनाशक कार्यक्रम आयोजित केले जात असत. सगरोळी, मुखेड, नायगाव, अतकली आणि कोंडलवाडी येथे लसीकरण शिबीर योजली जात. वर्षातून दोनदा आयोजित करण्यात येणाऱ्या या आरोग्य छावण्यांमध्ये  सुमारे १०,०००   गाढवांवर उपचार आणि लसीकरण केले जात असे

आज धर्मा गाढव अभयारण्यात  गाढवांसाठी निवारा उपलब्ध नसला तरी संस्कृती संवर्धन मंडळाद्वारे गाढवांच्या आरोग्य तपासणीची शिबिरे योजली जातात. अशा शिबिरात लसीकरणासह, गाढवांच्या आजारांचे निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया देखील करण्यात येतात.

Donkey Clinic

श्रीमती बोनी शहा जन्माने परदेशी होत्या पण या कामासाठी त्या सगरोळी राहायला येत असतं. समाजात गाढवे आणि इतर प्राण्यांसाठी करुणेची भावना निर्माण करण्यासाठी आणि लोकांना प्राण्यांविषयी  त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी त्या शिबिरे घेत असतं. गाढवांची चित्र असलेली खुंटाळी, भित्तीचित्रे, कानातील डूल अशा अनेक गोष्टी त्यांनी प्रचारासाठी तयार करून घेतल्या होत्या. लसीकरण कार्यक्रमाच्या दिवशी लसीकरणासाठी आलेल्या गाढवांना गरम गरम पाण्याने अंघोळ करण्याचे भाग्य देखील मिळत असे.

एकनाथ महाराजांची तहानलेल्या गाढवाला पाणी पाजल्याची गोष्ट ऐकली होती पण गाढवाची सेवा करणाऱ्यांची गोष्ट पहिल्यांदाच ऐकायला, पहायला मिळाली. नाहीतर माणसांच्या लेखी वाहतुकीचे काम करून घेतल्यावर गाढव म्हणजे उकिरडा फुंकणारा प्राणी !

प्रशांत दिवेकर 

ज्ञान प्रबोधिनी, पुणे  






Comments

Popular posts from this blog

Talk on Bhartiya Heritage of Educational Practices @ International Conference on Interpreting Cultures and Traditions: Shifting the Lenses

                                                    Talk on Indian Knowledge System : Bhartiya Heritage of Educational Practices   & Relevance in Contemporary Society   @ International Conference on Interpreting Cultures and Traditions:   Shifting the Lenses RIWATCH, Arunachal Pradesh   19-21 December 2025 I feel honoured to speak today as a plenary speaker at this international conference, Interpreting Cultures and Traditions – Shifting the Lenses, on Indian Knowledge Systems, especially traditional modes of knowledge transmission and their relevance in contemporary society. This session on Bharatiya Heritage of Educational Practices is being organised here at the RIWATCH campus. Standing at this podium today, I can recall the journey of RIWATCH—how it has grown ste...

पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरेतील मार्गदर्शक सिद्धांत

  पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरे तील मार्गदर्शक सिद्धांत अनुबन्ध चतुष्टय — ग्रंथलेखनाची चार पायाभूत तत्त्वे गेल्या आठवड्यात एका शिबिरासाठी सज्जनगड येथे जाण्याचा योग आला.   श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या कार्य आणि साधनेशी निगडित हे एक पवित्र स्थान आहे. तेथे विद्याव्रत संस्कार या विद्यार्थ्यांच्या संस्कार कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमार्फत आयोजित अभ्यास शिबिरात   सहभागी झालो होतो. ( विद्याव्रत संस्कार हा ज्ञान प्रबोधिनीद्वारा    विद्यार्थ्यांमध्ये “विद्यार्थीत्वाचे” गुण जागवण्यासाठी केला जाणारा शैक्षणिक संस्कार आहे. व्यक्ति विकासाच्या आयामांचा परिचय करून घेणे व विद्यार्थी जीवन काळात व्यक्तिमत्त्व विकसनासाठी आवश्यक अशा व्रतांचा परिचय करून घेवून   विद्या अध्ययनचा संकल्प करणे हे या शैक्षणिक संस्काराचे सूत्र आहे.   ) सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. सकाळच्या काकड्यापासून शेज आरतीपर्यंत एक निश्चित दिनक्रम तेथे आचाराला जातो. या दैनंदिन कार्यक्रमात प्रार्थना , अभिषेक–पूजन , महाप्रसाद , भजन आण...

RIWATCH IKS Lokvidya

   This video is based on a part of plenary talk delivered by me at RIWATCH, Arunachal Pradesh, during an international conference Interpreting Cultures and Traditions – Shifting the Lenses.  Drawing reflections based on my limited travel experiences from the North-East, it explores Bhartiya Jnana Parampara i.e Indian Knowledge Systems (IKS) as living educational traditions and reflects on how community wisdom and Lokavidyā can enrich contemporary education.