Skip to main content

स्व-विकासाचा मार्ग

 स्व-विकासाचा मार्ग

दुकानातून पातळ पोहे आणून त्याचा तयार केलेला चिवडा

आणि तेच पातळ पोहे दोन दिवस उन्हात वाळवून त्याचा केलेला चिवडा

— कोणता चिवडा जास्त आवडतो?
अळूची भाजी खाल्ल्यानंतर तुमच्या घशात कधी खवखवले आहे का?


हे दोन स्वयंपाकघराशी आणि खाण्याशी निगडीत प्रश्न सुरुवातीला का विचारतो आहे, असा प्रश्न मनात आला का?

दुकानातून आणलेले पोहे जरी कोरडे असले तरी पातळ पोहे उन्हात वाळवल्याने त्यातील उरलेसुरले बाष्प निघून जाते, तसेच उन्हात भाजल्याने ते जास्त खरपूस बनतात. कुरकुरीत असलेले पोहे उन्हात वाळवल्याने त्यांच्या कुरकुरीतपणा या गुणात वाढ होते.

अळूच्या पानात, देठात आणि कंदात कॅल्शियम ऑक्झालेटचे स्फटिक असतात, ज्यामुळे घसा खवखवतो. अळू शिजवण्यापूर्वी नीट धुतला आणि शिजवताना त्यात चिंच वा आंबट चुका वापरल्यास ही स्फटिकद्रव्ये कमी होऊन घसा खवखवण्याची शक्यता कमी होते. अळूच्या भाजीत शेंगदाणे–खोबरे ही चव वाढवणारी भर नंतरची, पण आधी चिंच वापरून भाजीतील दोष दूर करावा लागतो.

स्वयंपाक करताना आपण पदार्थावर अनेक क्रिया करत असतो, ज्यामुळे पदार्थातील दोष कमी होतात किंवा निघून जातात, तसेच काही प्रक्रिया अशा असतात की ज्यामुळे पदार्थाच्या अंगभूत गुणांमध्ये वाढ होते. आठवून तर पाहा — आपण खाण्यासाठी काय काय करतो!

आपल्या दैनंदिन जीवनात स्वयंपाकघर हे असे ठिकाण आहे जेथे आपण 

गुणाधान आणि दोषापनयन या प्रक्रिया सतत करत असतो. 

भारतीय ज्ञानपरंपरेत आयुर्वेदात औषधे तयार करताना पदार्थाचे औषधात रूपांतर करण्यासाठी पदार्थाच्या गुणांमध्ये ‘आधान’ म्हणजे वाढ करणे, रुजवणे, प्रदान करणे आणि पदार्थातील दोषांचे ‘अपनयन’ म्हणजे दूर करणे, काढून टाकणे, नष्ट करणे — या दोन प्रकारच्या प्रक्रिया सुचवल्या आहेत. 

व्यक्तिमत्त्वविकसन म्हणजे काय?

तर सद्गुणांची रुजवण म्हणजेच सकारात्मक गुणांची भर घालणे

आणि दोषांचे निरसन करणे म्हणजेच नकारात्मक गुणांचे उच्चाटन करणे.

त्यामुळे व्यक्तिमत्त्वविकसनासाठी शैक्षणिक अनुभवांची योजना करायची असेल तर त्या अनुभवांमुळे गुणाधान वा/आणि दोषापनयन होईल, याची योजकाने काळजी घेतली पाहिजे.

खरेतर योजकाने अशा अनुभवांची योजना करायला हवी की, ज्या अनुभवाद्वारे साधक–विद्यार्थ्याला ही व्यक्तिमत्त्वविकासाची द्विसूत्री — चांगले गुण बाणवणे आणि वाईट सवयी दूर करणे — स्वतः करता येईल.

गुणाधान आणि दोषापनयन या प्रक्रियेची सुरुवात आत्मपरीक्षणाने होते. 

"आपल्याकडे कोणते गुण आधीपासून आहेत?" आणि "कोणते दोष आपल्या प्रगतीस अडथळा ठरत आहेत?" हे दोन प्रश्न विचारून जी यादी तयार होईल, त्यातून सद्यस्थिती समजून घेता येईल. 

त्यानंतर कशात बदल करायचा आहे, त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करून त्यातील बदलांचे उद्दिष्ट मांडणारे संकल्प वर्षारंभी करता येतील. वर्षाअखेरीस मनोगत लेखनात गुणाधान आणि दोषापनयन यांचा आढावा घेता येईल.

एक कल्पना!

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात

गुणाधान आणि दोषापनयन यावर आधारित एक नोंदपत्रक विद्यार्थ्यांना वर्षाअखेरीस देता येईल का?

किंवा त्यांच्याकडून असे स्वमूल्यमापन पत्रक तयार करून घेता येईल का?

गुणाधान आणि दोषापनयन : स्व-विकासाचा मार्ग

भारतीय ज्ञान परंपरेतील सूत्रे

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे

Comments

  1. खूप छान 👍

    ReplyDelete
  2. उत्तम आह़े ही प्रक्रिया

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Talk on Indian Knowledge Systems in Curriculum @ Samvit Sangam

  Talk on Indian Knowledge Systems in Curriculum @ Samvit Sangam Namaste to all. I feel honoured to speak on Indian Knowledge Systems in Education at Samvit Sangam , organized by Samvit Research Foundation. I had the privilege to represent Jnana Prabodhini and speak at Samvit Sangam — a one-day symposium on the integration of Indian Knowledge Systems (IKS) in school education. I’ll keep to the time and share a few key points and practices from Jnana Prabodhini, so we can stay on track with the schedule. In the inaugural session, Anuragji raised important questions regarding the term Indian Knowledge System —its acronym IKS, and whether we ought to replace it with Bhartiya Gyan Parampara . For clarity, I will continue to refer to it as IKS-Parampara . The distinction between “ Indian Knowledge System ” and “Bhartiya Gyan Parampara” is significant. The English term “system” invokes several dimensions: What is the foundation of this system? What are the sources of its knowl...

स्वाध्यायप्रवचन 5 :अतिथयश्च स्वाध्यायप्रवचने च

' अतिथयश्च स्वाध्यायप्रवचने च ' मैं मई २०१२ में , युवतियों के एक गुट के साथ अरुणाचल प्रदेश के अलो गा ँ व गया था। वहाँ हम रामकृष्ण मिशन के आश्रम में देर रात पहुँचे। अधिकांश लड़कियाँ यात्रा से थकी हुई थीं। देर हो जाने के कारण , मठ के ब्रह्मचारी महाराज ने सुझाव दिया कि हम सीधे भोजनगृह में जाएँ , भोजन करके विश्राम करें और सुबह सबसे परिचय करेंगे। भोजनगृह में एक स्वामीजी हमें भोजन परोस रहे थे। लड़कियाँ उन्हें बुलाकर अपनी जरूरत के व्यंजन मांग रही थीं । स्वामीजी अत्यंत शांति और विनम्रता से उनकी खातिरदारी कर रहे थे, उनकी इच्छानुसार व्यंजन परोस रहे थे। भोजन के बाद , पूरा गूट तुरंत विश्राम के लिए चला गया। अगले दिन , उपासना और मंदिर दर्शन के बाद हम आश्रम के मुख्य स्वामीजी से मिलने उनके कार्यालय गए। रात को भोजन परोसने वाले स्वामीजी ही आश्रम के मुख्य स्वामीजी थे। उन्हें प्रमुख कार्यालय में देखकर लड़कियाँ स्तब्ध रह गईं। उसी दिन शाम को हम एक नदी पर बने झूलते पुल और एक जनजाती बस्ती को देखने गए। बस्ती में हमारा बहुत अच्छा स्वागत हुआ। लड़कियों को चार-चार के समूह में विभाजित कर अलग-अलग घरों म...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...