Skip to main content

जागतिक पुस्तक दिवस


आज जागतिक पुस्तक दिवस  आहे. 

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात संवादिनीच्या शिरूर गटासाठी 'वाचन समृद्धी' या विषयावर एक व्याख्यान दिले होते. 

या सत्रानंतर संवादिनी गटातील सुषमाताई बोरा यांनी सत्राच्या मांडणीतील आशय सूत्रबद्ध रुपात संकलित केला होतो. 

आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त त्यांनी मांडलेला सूत्रबद्ध आशय साभार  ब्लॉगवर पोस्ट करत आहे. 


 वाचन ,एक कला

विविध पुस्तकांसंगे घेऊ,

               चला उंच भरारी ,

साथीने त्याच्या नक्कीच होईल ,

         गोपालकाला औंदा भारी  ।


जिथे ठरले जायाचे ,

           तिथे तर आम्ही जाऊ,

चक्र फिरवण्या वाचण्याचे ,

             झटपट तयार होऊ ।


दिमाखात झाली सुरुवात ,

     पद्द्याने मासिक बैठकीची,

Fb पोस्ट,वर्तमानपत्र,

      पाने चाळली कादंबरीची


पॅम्पलेट पासून पुस्तकांपर्यत,

               घेतला गेला धांडोळा ,

जाहिरातीतही दडलेला असतो,

            रूपकात्मक अर्थसोहळा ।


कशासाठी वाचतो ? ,

           याचे असायला हवे ज्ञान,

माहिती ,अनुभव,मनोरंजन,

                 येते जगण्याचे भान ।


करून बघावी तुलना ,

          पुस्तक व सिनेमात ,

स्वतः रंगवून कल्पनाचित्र,

           गढून जातो वाचनात ।


भूगोलाच्या धड्या परी,

   प्रवासवर्णनाने पडते ज्ञानात भर,

लेखकाच्या अनुभवासंगे,

        घडत जाते जगाची सफर


कल्पनाविश्वात रमणं ,

           हीच वाचनाची ताकद खरी,

अनुभव, वृत्ती, भाव रुपात,

               समृद्धीची कास धरी ।


करा ठरवून वाचन ,

     नको शब्दाक्षरांशी झगडा,

कृती करून वेगवेगळ्या,

       वाढवा वाचनावरील पगडा ।


वर्णमालेशी करू मैत्री ,

     होत जाईल वाचन शुद्ध ,

घेऊ वसा वाचनाचा ,

      करण्या जीवन समृद्ध ।


रद्दीतही गवसेल परीस ,

     जर असेल शोधक मती ,

स्पर्शीता पानापानाला ,

        वाढेल आपली वाचन गती


चलचित्र व जाहिरातपट्टीची,

        घालायला हवी योग्य सांगड ,

करून सवय, चढायला हवा ,

             भरभर वाचनाचा गड ।


वाचता आत्मचरित्र ,

       कळते जीवनातील डागडुजी,

त्यांच्या पायपीट,संघर्षापुढे ,

      आपली दुःखं होतात खुजी ।


असेल आवड तर मिळेल सवड,

                       नको काही सबब ,

क्लुप्त्या करून निरनिराळ्या,

                करा संकल्प अजब


रूप पालटून नावडतीचे,

     खाऊ घालतो मुलांना भाजी ,

तसेच वाचण्या विविध प्रकार ,

       आपले मनही करावे राजी ।


आधी खूप खूप ऐका,

            ऐकण्या बरोबर वाचा ,

प्रक्रिया अविरत ठेवली तर,

       सुरळीत होईल वाचन ढाचा


सारखा येता विचार मनी ,

      घ्यावा थोडा विश्राम ,

रेघ आखून त्याखाली ,

             चालू ठेवा काम ।


वाढवू खोली वाचनाची ,

        झटकू या जुलमी आळस,

मजबूत करू वाचन प्रणाली,

           गाठू या सुवर्णकळस ।


नीता, सोनालीताईंच्या प्रयत्नाने,

            अभिवाचन झाले सुलभ,

प्रशांतसरांच्या शिकवणीने ,

                दूर झाले शंकांचे मळभ ।

                 सौ. सुषमा बोरा ,

                      १२..८..२०२०



Comments

Popular posts from this blog

Talk on Bhartiya Heritage of Educational Practices @ International Conference on Interpreting Cultures and Traditions: Shifting the Lenses

                                                    Talk on Indian Knowledge System : Bhartiya Heritage of Educational Practices   & Relevance in Contemporary Society   @ International Conference on Interpreting Cultures and Traditions:   Shifting the Lenses RIWATCH, Arunachal Pradesh   19-21 December 2025 I feel honoured to speak today as a plenary speaker at this international conference, Interpreting Cultures and Traditions – Shifting the Lenses, on Indian Knowledge Systems, especially traditional modes of knowledge transmission and their relevance in contemporary society. This session on Bharatiya Heritage of Educational Practices is being organised here at the RIWATCH campus. Standing at this podium today, I can recall the journey of RIWATCH—how it has grown ste...

पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरेतील मार्गदर्शक सिद्धांत

  पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरे तील मार्गदर्शक सिद्धांत अनुबन्ध चतुष्टय — ग्रंथलेखनाची चार पायाभूत तत्त्वे गेल्या आठवड्यात एका शिबिरासाठी सज्जनगड येथे जाण्याचा योग आला.   श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या कार्य आणि साधनेशी निगडित हे एक पवित्र स्थान आहे. तेथे विद्याव्रत संस्कार या विद्यार्थ्यांच्या संस्कार कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमार्फत आयोजित अभ्यास शिबिरात   सहभागी झालो होतो. ( विद्याव्रत संस्कार हा ज्ञान प्रबोधिनीद्वारा    विद्यार्थ्यांमध्ये “विद्यार्थीत्वाचे” गुण जागवण्यासाठी केला जाणारा शैक्षणिक संस्कार आहे. व्यक्ति विकासाच्या आयामांचा परिचय करून घेणे व विद्यार्थी जीवन काळात व्यक्तिमत्त्व विकसनासाठी आवश्यक अशा व्रतांचा परिचय करून घेवून   विद्या अध्ययनचा संकल्प करणे हे या शैक्षणिक संस्काराचे सूत्र आहे.   ) सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. सकाळच्या काकड्यापासून शेज आरतीपर्यंत एक निश्चित दिनक्रम तेथे आचाराला जातो. या दैनंदिन कार्यक्रमात प्रार्थना , अभिषेक–पूजन , महाप्रसाद , भजन आण...

भारताचे संविधान : संविधान दिनानिमित्त विद्यार्थांसाठी कार्यपत्रिका

  भारताचे संविधान  संविधान दिनानिमित्त विद्यार्थांसाठी कार्यपत्रिका  आपण शाळेत प्रार्थनेच्या वेळी नियमितपणे राष्ट्रगीत , प्रतिज्ञा , वंदेमातरम आणि   भारताच्या संविधानाची उद्देशिका याचे पठण करतो.   या कार्यपत्रिकेत आपण भारताच्या संविधाना च्या उद्देशिकेची  माहिती करून घेताना  हे संविधान कसे तयार झाले , कोणी तयार केले , संविधान  निर्मितीची प्रक्रिया कशी होती याचा परिचय करून घेणार आहोत.  २६ नोव्हेंबर आपण भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करतो. संविधान दिवसापर्यंत खाली दिलेल्या कृती करत भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचा  परिचय करून घेवू या . कृती. १ :   राष्ट्रगीत , प्रतिज्ञा , वंदेमातरम आणि   भारताच्या संविधानाची उद्देशिका  यापैकी एक ज्याचे रोज  शाळेत रोज ज्याचे पठाण केले जाते  ते पुस्तकात न बघता वहीत लेखन करा. कृती २ :   भारतीय स्वातंत्र्य आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना याचे नाते उलगडून सांगणारी ‘ इंडिया : द स्पिरीट ऑफ फ्रिडम’ छोट्या फिल्मची लिंक खाली देत आहे. फिल्म बघून झाल्यावर आवडली तर आपल्या एका मित्रा...