Skip to main content

जागतिक पुस्तक दिवस


आज जागतिक पुस्तक दिवस  आहे. 

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात संवादिनीच्या शिरूर गटासाठी 'वाचन समृद्धी' या विषयावर एक व्याख्यान दिले होते. 

या सत्रानंतर संवादिनी गटातील सुषमाताई बोरा यांनी सत्राच्या मांडणीतील आशय सूत्रबद्ध रुपात संकलित केला होतो. 

आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त त्यांनी मांडलेला सूत्रबद्ध आशय साभार  ब्लॉगवर पोस्ट करत आहे. 


 वाचन ,एक कला

विविध पुस्तकांसंगे घेऊ,

               चला उंच भरारी ,

साथीने त्याच्या नक्कीच होईल ,

         गोपालकाला औंदा भारी  ।


जिथे ठरले जायाचे ,

           तिथे तर आम्ही जाऊ,

चक्र फिरवण्या वाचण्याचे ,

             झटपट तयार होऊ ।


दिमाखात झाली सुरुवात ,

     पद्द्याने मासिक बैठकीची,

Fb पोस्ट,वर्तमानपत्र,

      पाने चाळली कादंबरीची


पॅम्पलेट पासून पुस्तकांपर्यत,

               घेतला गेला धांडोळा ,

जाहिरातीतही दडलेला असतो,

            रूपकात्मक अर्थसोहळा ।


कशासाठी वाचतो ? ,

           याचे असायला हवे ज्ञान,

माहिती ,अनुभव,मनोरंजन,

                 येते जगण्याचे भान ।


करून बघावी तुलना ,

          पुस्तक व सिनेमात ,

स्वतः रंगवून कल्पनाचित्र,

           गढून जातो वाचनात ।


भूगोलाच्या धड्या परी,

   प्रवासवर्णनाने पडते ज्ञानात भर,

लेखकाच्या अनुभवासंगे,

        घडत जाते जगाची सफर


कल्पनाविश्वात रमणं ,

           हीच वाचनाची ताकद खरी,

अनुभव, वृत्ती, भाव रुपात,

               समृद्धीची कास धरी ।


करा ठरवून वाचन ,

     नको शब्दाक्षरांशी झगडा,

कृती करून वेगवेगळ्या,

       वाढवा वाचनावरील पगडा ।


वर्णमालेशी करू मैत्री ,

     होत जाईल वाचन शुद्ध ,

घेऊ वसा वाचनाचा ,

      करण्या जीवन समृद्ध ।


रद्दीतही गवसेल परीस ,

     जर असेल शोधक मती ,

स्पर्शीता पानापानाला ,

        वाढेल आपली वाचन गती


चलचित्र व जाहिरातपट्टीची,

        घालायला हवी योग्य सांगड ,

करून सवय, चढायला हवा ,

             भरभर वाचनाचा गड ।


वाचता आत्मचरित्र ,

       कळते जीवनातील डागडुजी,

त्यांच्या पायपीट,संघर्षापुढे ,

      आपली दुःखं होतात खुजी ।


असेल आवड तर मिळेल सवड,

                       नको काही सबब ,

क्लुप्त्या करून निरनिराळ्या,

                करा संकल्प अजब


रूप पालटून नावडतीचे,

     खाऊ घालतो मुलांना भाजी ,

तसेच वाचण्या विविध प्रकार ,

       आपले मनही करावे राजी ।


आधी खूप खूप ऐका,

            ऐकण्या बरोबर वाचा ,

प्रक्रिया अविरत ठेवली तर,

       सुरळीत होईल वाचन ढाचा


सारखा येता विचार मनी ,

      घ्यावा थोडा विश्राम ,

रेघ आखून त्याखाली ,

             चालू ठेवा काम ।


वाढवू खोली वाचनाची ,

        झटकू या जुलमी आळस,

मजबूत करू वाचन प्रणाली,

           गाठू या सुवर्णकळस ।


नीता, सोनालीताईंच्या प्रयत्नाने,

            अभिवाचन झाले सुलभ,

प्रशांतसरांच्या शिकवणीने ,

                दूर झाले शंकांचे मळभ ।

                 सौ. सुषमा बोरा ,

                      १२..८..२०२०



Comments

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरेतील मार्गदर्शक सिद्धांत

  पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरे तील मार्गदर्शक सिद्धांत अनुबन्ध चतुष्टय — ग्रंथलेखनाची चार पायाभूत तत्त्वे गेल्या आठवड्यात एका शिबिरासाठी सज्जनगड येथे जाण्याचा योग आला.   श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या कार्य आणि साधनेशी निगडित हे एक पवित्र स्थान आहे. तेथे विद्याव्रत संस्कार या विद्यार्थ्यांच्या संस्कार कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमार्फत आयोजित अभ्यास शिबिरात   सहभागी झालो होतो. ( विद्याव्रत संस्कार हा ज्ञान प्रबोधिनीद्वारा    विद्यार्थ्यांमध्ये “विद्यार्थीत्वाचे” गुण जागवण्यासाठी केला जाणारा शैक्षणिक संस्कार आहे. व्यक्ति विकासाच्या आयामांचा परिचय करून घेणे व विद्यार्थी जीवन काळात व्यक्तिमत्त्व विकसनासाठी आवश्यक अशा व्रतांचा परिचय करून घेवून   विद्या अध्ययनचा संकल्प करणे हे या शैक्षणिक संस्काराचे सूत्र आहे.   ) सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. सकाळच्या काकड्यापासून शेज आरतीपर्यंत एक निश्चित दिनक्रम तेथे आचाराला जातो. या दैनंदिन कार्यक्रमात प्रार्थना , अभिषेक–पूजन , महाप्रसाद , भजन आण...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...