Skip to main content

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

 तंत्रज्ञानी नवे सहस्रक

ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते.

तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे

अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे

मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.  

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून  विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना  तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,  टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा लक्षात घेवून अटल टिंकरिंग प्रयोगशाळा, मेकर्स स्पेस, इन्स्पायर पुरस्कार, इग्नाइट पुरस्कार असे अनेक नवीन उपक्रम शिक्षण क्षेत्रात राबवले जात आहेत.  

गेल्या पंच्चाहत्तर  वर्षांतील तंत्र शिक्षणाचा आढावा घेतला तर तंत्रज्ञानाच्या शिक्षणात तीन प्रमुख आयामांचा विचार करणे आवश्यक वाटते. कौशल्य विकसनासाठी हाताने काम करण्याची संधी देणारे कृतीप्रधान शिक्षण,  नवनिर्मिती करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी कल्पकतेलावाव देणाऱ्या शैक्षणिक रचना, फक्त नोकरी मागणारे कामगार तयार न होता संपत्ती निर्माण करणण्याचा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी उद्योजकता विकासाचे अनुभव या तीन मुद्द्यांचा  विचार केलातर तर वरील काव्यपंक्तीतील  विज्ञान-तंत्रज्ञानाच्या हाकेला आपण ओ/प्रतिसाद देवू शकू.

आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या शैक्षणिक रचनांमधून निर्माण होणारे मनुष्यबळ पाहिल्यावर मानवी स्वभाव वा वृत्तीबद्दलची दोन प्रमुख आव्हाने जाणवतात. एक विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार कसे करायचे आणि दुसरे, असे श्रम करून जे निर्मितीचे काम करतात त्यांच्याबद्दलचा कृतज्ञताभाव विद्यार्थ्यांच्या मनात कसा जागवायचा?

 हे दोन संस्कार करता आले तर तंत्रज्ञानाच्या सहस्त्रकात मानवातील मनुष्यत्व जोपासता येईल, देशात भौतिक संपत्तीच्या जोडीने सद्गुणसंपत्ती निर्माण करता येईल आणि शिक्षण फक्त जेवणदायी न राहता जीवनदायी होईल.

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या शिक्षणातून हे घडावे, यासाठी एक प्रार्थना

वदनि कवळ घेता नाम घ्या मातृभूचे

सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे

कृषीवल कृषीकर्मी राबती दिवसरात्र

श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात

स्मरणकरुनी त्यांचे अन्नसेवा खुशाल

उदरभरण व्हावे चित्त होण्या विशाल

प्रशांत दिवेकर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Samaj Darshan: Understanding Solapur’s Railway System

Samaj Darshan: Understanding Solapur’s Railway System Every year, we at Jnana Prabodhini, Solapur, conduct the Samaj Darshan initiative—an experiential learning programme designed to help students know their society, understand real systems, and connect with culture, heritage, and civic life. The objective of Samaj Darshan is to help students observe, explore, and understand their immediate surroundings and societal systems, fostering awareness, inquiry, and a sense of responsibility towards society. While planning this year’s edition, a question guided us: How can we help students truly connect classroom learning with the functioning of the real world? The answer lay right around us—in the very tracks that run through our city. In 2024, we chose to focus on Solapur’s Railway System, a living example of civic structure, human coordination, and nation-building in action. Why Understanding Systems in the Functioning of Society is important Modern society operates through a ne...

वंदे गुरु परंपरा

वंदे गुरु परंपरा गुरुपौर्णिमा   अर्थात   ज्ञानाच्या   परंपरांचे   पाईक   होण्याचा   दिवस इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) भगवद् गीतेत देखील श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानाच्या परंपरेचा दाखला दिला आहे. ते म्हणतात ‘ मी हा अव्यय ( अविनाशी ) योग सूर्याला सांगितला. सूर्याने मनुला सांगितला व मनूने  इक्ष्वाकू   सांगितला.  भारतीय परंपरेत नवीन ज्ञानतत्वाज्ञाच्या शाखांची मांडणी करताना देखील असा गुरु परंपरेचा वारसा सांगितला जातो. कारण ज्ञानाच्या परंपरेच्या संक्रमणातूनच ज्ञान वृद्धिगत होत जाते.                ज्ञान   प्रबोधिनीने   पथकाधिपती   म्हणून   समर्थ   रामदास ,  स्वामी   दयानंद ,  स्वामी   विवेकानंद   आणि   योगी   अरविंद या चार व्यक्तींचा स्वीकार केला आहे.   त्यापैकी एक म्हणजे समर्थ रामदास! कवि   वामन   पंडितांनी   समर्थांची ...

Vande Guru Parampara

  Vande Guru Parampara Guru Purnima – Honouring Our Gurus, Upholding the Tradition इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) In the Bhagavad Gita, while advising Arjuna, Lord Krishna gives an example of the tradition of knowledge. He says, “I imparted this indestructible Yoga to the Sun (Vivasvan), who passed it on to Manu, and Manu, in turn, passed it on to Ikshvaku.” In the Indian tradition, whenever new knowledge or philosophy is presented, the legacy of the Guru's tradition is also acknowledged—because knowledge flourishes only when its lineage is preserved and passed on. Jnana Prabodhini has accepted four great personalities—Samarth Ramdas, Swami Dayananda, Swami Vivekananda, and Yogi Arvind—as its visionaries, and pathfinders who have shaped Jnana Prabodhini ideals and direction. Today, let us learn about Samarth Ramdas. The poet Vaman Pandit praises him with the following verse. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे...