Skip to main content

कर्मयोगश्लोकसंग्रहः

 कर्मयोगश्लोकसंग्रहः


अथ श्रीमद् भगवद् गीतासु कर्मयोगः

श्रीभगवानुवाच


कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिण: |

जन्मबन्धविनिर्मुक्ता: पदं गच्छन्त्यनामयम् ॥२—५१॥

ज्ञानी समत्व-बुद्धीनें कर्माचें फळ सोडूनी

जन्माचे तोडिती बंध पावती पद अच्युत ॥२—५१॥

 

विहाय कामान्य: सर्वान्पुमांश्चरति नि:स्पृह: |

निर्ममो निरहङ्कार: स शान्तिमधिगच्छति ॥२-७१॥

सोडूनि कामना सर्व फिरे होऊनि निःस्पृह

अहंता ममता गेली झाला तो शांति-रूप चि ॥२-७१॥

 

न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते |

न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥३-४ ॥

न कर्मारंभ टाळूनि लाभे नैष्कर्म तें कधीं

संन्यासाच्या  क्रियेनें चि कोणी सिद्धि न मेळवी ॥३-४ ॥

 

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् |

कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणै: ॥३-५॥

कर्माविण कधीं कोणी न राहे क्षण-मात्र हि

प्रकृतीच्या गुणीं सारे बांधिले करितात चि ॥३-५॥

 

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् |

इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचार: स उच्यते ॥३-६॥

इंद्रियें करिता कर्म मूढ त्यांस चि रोधुनी

राहतो भोग चिंतूनि तो मिथ्याचार बोलिला ॥३-६॥

 

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् |

विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ॥१८-१४ ॥

अधिष्ठान अहंकार तशीं विविध साधने

वेगळाल्या क्रिया नाना दैव तें  येथ पाचवें ॥१८-१४ ॥

 

नियतं सङ्गरहितमरागद्वेषत: कृतम् |

अफलप्रेप्सुना कर्म यतत्सात्विकमुच्यते ॥१८-२३॥

नेमिलें जें न गुंतूनि राग-द्वेष न राखतां

केलें निष्काम-वृतीनें कर्म तें होय सात्विक ॥१८-२३॥

 

यत्तुžकामेप्सुना कर्म साहङ्कारेण वा पुन: |

क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम् ॥१८-२४॥

धरूनि कामना चित्तीं जें अहंकार-पूर्वक

केलें महा खटाटोपें कर्म तें होय राजस ॥१८-२४॥

 

अनुबन्धं क्षयं हिंसामनपेक्ष्य च पौरुषम् |

मोहादारभ्यते कर्म यतत्तामसमुच्यते ॥१८-२५॥

विनाश वेंच निष्पत्ति सामर्थ्य हि न पाहतां

आरंभिलें चि जें मोहें कर्म तें होय तामस ॥१८-२५॥

 

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् |

आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: ॥६-५॥

उद्धरावा स्वयें आत्मा खचूं देऊं नये कधीं

आत्मा चि आपला बंधु आत्मा चि रिपु आपुला ॥६-५॥

 

मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वित: |

सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकार: कर्ता सात्विक उच्यते ॥१८-२६॥

निःसंग निरहंकार उत्साही धैर्य-मंडित

फळो जळो चळे ना तो कर्ता सात्विक बोलिला ॥१८-२६॥

 

अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भव: |

यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञ: कर्मसमुद्भव: ॥३-१४॥

अन्नापासूनि हीं भूतें पर्जन्यांतूनि अन्न तें

यज्ञें पर्जन्य तो होय यज्ञ कर्मामुळें घडे ॥३-१४॥

 

कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् |

तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥३-१५॥

प्रकृतीपासुनी क्रम ब्रह्मीं प्रकृति राहिली

ऐसें व्यापक ते ब्रह्म यज्ञांत भरलें सदा ॥३-१५॥

 

यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन |

कर्मेन्द्रियै: कर्मयोगमसक्त: स विशिष्यते ॥३-७ ॥

जो इंद्रियें मनानें तीं नेमुनी त्यांस राबवी

कर्म-योगांत निःसंग तो विशेष चि मानिला ॥३-७ ॥

 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ||२-४७  ||

कर्मांत चि तुझा भाग तो फळांस नसो कधीं

नको कर्म-फळीं हेतु अकर्मी वासना नको  ||२-४७  ||

 

योगस्थ: कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय |

सिद्ध्यसिद्ध्यो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥२-४८॥

फळ लाभो न लाभो तूं  निःसंग सं होउनी

योग-युक्त करीं कर्में योग-सार समत्व चि ॥२-४८॥

 

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते |

तस्माद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम् ॥२-५०॥

येथें समत्व-बुद्धीनें टळे सुकृत-दुष्कृत

समत्व जोड ह्यासाठीं तें चि कर्मांत कौशल ॥२-५०॥

 

यत: प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् |

स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानव: ॥१८-४६॥

जो प्रेरी भूत-मात्रास ज्याचा विस्तार विश्व हें

स्व-कर्म-कुसुमीं त्यास पूजितां मोक्ष लाभतो ॥१८-४६॥

 

तस्मादसक्त: सततं कार्यं कर्म समाचर |

असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुष: ॥३-१९॥

म्हणूनि नित्य निःसंग करीं कर्तव्य कर्म तूं

निःसंग करितां कर्म कैवल्य-पद पावतो ॥३-१९॥

 

कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादय: |

लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि ॥३-२०॥

कर्म-द्वारा चि सिद्धीस पावले जनकादिक

करीं तूं कर्म लक्षूनि लोक-संग्रह-धर्म हि ॥३-२०॥

 

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन: |

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥३-२१॥

जें जें आचरितो श्रेष्ठ तें तें चि दुसरे जन

तो मान्य करितो जें जें लोक चालवितात तें ॥३-२१॥

 

सक्ता: कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत |

कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम् ॥३-२५॥

गुंतूनि करिती ज्ञात्यानें मोकळेपणें

करावें कर्म तैसें चि इच्छुनी लोक-संग्रह ॥३-२५॥

 

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा |

निराशीर्निनर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वर: ॥३-३०॥

मज अध्यात्म-वृत्तीनें सर्व कर्में समर्पुनी

फलाशा ममता सर्व सोडुनी झुंज तूं  सुखें ॥३-३०॥

 

कर्मण्यकर्म य: पश्येदकर्मणि च कर्म य: |

स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्त: कृत्स्नकर्मकृत् ॥४-१८॥

कर्मीं अकर्म जो पाहे अकर्मीं जो तसे

तो बुद्धिमंत लोकांत तो योगी कृत-कृत्य तो  ॥४-१८॥

 

त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रय: |

कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति स: ॥४-२०॥

नित्य-तृप्त निराधार न राखे फल-वासना

गेला गढूनि कर्मांत तरी कांही करी चि ना ॥४-२०॥

 

निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रह: |

शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥४-२१॥

संयमी सोडुनी सर्व इच्छेसह परिग्रह

शरीरें चि करी कर्म दोष त्यास न लागतो ॥४-२१॥


गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतस: |

यज्ञायाचरत: कर्म समग्रं प्रविलीयते ॥४-२३॥

ज्ञानांत बैसली वृत्ति संग सोडूनि मोकळा

यज्ञार्थ करितो कर्म जाय सर्व जिरूनि ते ॥४-२३॥

 

ॐ तत्सदिति श्रीमद् भगवद् गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां

योगशास्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे  कर्मयोगश्लोकसंग्रहः ।

हरिः ॐ तत्सत् ।

संदर्भ : पदावली, विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी,

                                                      गीता-गीताई; संकलन, ज्ञान प्रबोधिनी   

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरु परंपरा

वंदे गुरु परंपरा गुरुपौर्णिमा   अर्थात   ज्ञानाच्या   परंपरांचे   पाईक   होण्याचा   दिवस इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) भगवद् गीतेत देखील श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानाच्या परंपरेचा दाखला दिला आहे. ते म्हणतात ‘ मी हा अव्यय ( अविनाशी ) योग सूर्याला सांगितला. सूर्याने मनुला सांगितला व मनूने  इक्ष्वाकू   सांगितला.  भारतीय परंपरेत नवीन ज्ञानतत्वाज्ञाच्या शाखांची मांडणी करताना देखील असा गुरु परंपरेचा वारसा सांगितला जातो. कारण ज्ञानाच्या परंपरेच्या संक्रमणातूनच ज्ञान वृद्धिगत होत जाते.                ज्ञान   प्रबोधिनीने   पथकाधिपती   म्हणून   समर्थ   रामदास ,  स्वामी   दयानंद ,  स्वामी   विवेकानंद   आणि   योगी   अरविंद या चार व्यक्तींचा स्वीकार केला आहे.   त्यापैकी एक म्हणजे समर्थ रामदास! कवि   वामन   पंडितांनी   समर्थांची ...

Vande Guru Parampara

  Vande Guru Parampara Guru Purnima – Honouring Our Gurus, Upholding the Tradition इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) In the Bhagavad Gita, while advising Arjuna, Lord Krishna gives an example of the tradition of knowledge. He says, “I imparted this indestructible Yoga to the Sun (Vivasvan), who passed it on to Manu, and Manu, in turn, passed it on to Ikshvaku.” In the Indian tradition, whenever new knowledge or philosophy is presented, the legacy of the Guru's tradition is also acknowledged—because knowledge flourishes only when its lineage is preserved and passed on. Jnana Prabodhini has accepted four great personalities—Samarth Ramdas, Swami Dayananda, Swami Vivekananda, and Yogi Arvind—as its visionaries, and pathfinders who have shaped Jnana Prabodhini ideals and direction. Today, let us learn about Samarth Ramdas. The poet Vaman Pandit praises him with the following verse. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे...

महाराष्ट्रधर्म

                                                                                       महाराष्ट्रधर्म १९९९ साली महिनाभराच्या ईशान्य भारत दौऱ्यात गुवाहाटी येथे केशवधाम कार्यालयात पूर्वांचलातील कामांचा परिचय करून घेण्यासाठी गेलो होतो. ज्यांना भेटायचे होते त्यांची वाट पाहत कार्यालयात बसलो होतो. एक आजोबा कार्यालयात डोकावले. बाहेरचे पाहुणे आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी , “ कुठून आलात ? किती दिवस प्रवास आहे ? काय काय पाहिले ?” अशी चौकशी केली. महाराष्ट्रातून आलो आहोत हे कळल्यावर त्यांनी आम्हाला विचारले , “ तुम्ही रायगडावर जाऊन आला आहात का ?” आम्ही “हो , रायगड पाहिला आहे ,” असे सांगितल्यावर त्या आजोबांनी एकदम आम्हाला साष्टांग नमस्कार केला. आम्ही गोंधळलो. “काय झाले ?” म्हणून त्यांना   विचारले. मग आमच्या शेजारी बसत फालूदा   म्...