' मिझोराम : दहशतवादाचा उदय अस्त ?' मिझोराममधील डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या बक्तॉम गावात रात्री मुक्कामी होतो. गावकऱ्यांशी गप्पा मारताना त्यांनी मिझो संस्कृतीतील एक म्हण सांगितली ' बांबूला जेव्हा फुलं येतात तेव्हा त्या मागोमाग दुष्काळ , मृत्यू आणि विध्वंस येतो. ' सन १९५९...... . या म्हणीचा प्रत्यंतर येणार होता. इतिहासाची पुनरावृत्ती मिझो लोकांएवढी क्वचित कोणी पुन्हा पुन्हा अनुभवली असेल. १८६२ , १८८१ , १९१२ , १५५९. ह्यावेळी मिझोरामधील मौतम...... नाव पण मौत ….... म् आणि शिंगतम (मेलिकोना बॅसिफेरा) जातीच्या बांबूला फुलोरा आला. बांबूला फुले आल्यानंतर बांबूचे आयुष्य संपते. मिझोराममध्ये प्रवास करताना मैलोंमैल प्रवास बांबूबनातून बांबूच्या जंगलातून होतो. बांबूला आयुष्यात एकदाच फुले येतात. प्रजातीनुसार ४० ते ६० वर्षांनंतर फुले येतात. फुले येऊन गेल्यावर बांबू नष्ट होतो. पर्यायाने कालांतराने जंगतालीत जमिन उघडी पडते. त्यामुळे अन्न व पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते. बांबूच्या फुलोऱ्यापासून तयार झालेले बीज जंगलात पसरते. हे बीज उंदरांचे आवडते अन्न आहे. बांबूच्या बिया खाल्यावर उं...
'अभ्यास देशस्थितीचा समतोल चलो' ज्ञान प्रबोधिनीच्या कामाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात शिक्षण विश्वाचे झालेले दर्शन व त्या निमित्ताने झालेला विचार मांडण्यासाठीचे लेखन