Skip to main content

पुस्तक परिचय : ‘शिक्षण व्हावे चैतन्यदायी’

 

पुस्तक परिचय : ‘शिक्षण व्हावे चैतन्यदायी’

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात विचार मंथन सुरू झाले आहे. धोरण विचार प्रत्यक्ष कृतीरूपात आणण्यासाठी येत्या दहा वर्षाचा कालखंड हा संक्रमणाचा कालखंड असणार आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाबरोबर शिक्षणाची गुणवत्ता  हा महत्त्वाचा घटक या कालखंडात कृतीरूप आराखड्यात आणण्यासाठी  रचनाबद्ध प्रयत्न करण्याची गरज आहे. कोणत्याही देशाच्या विकासाच्या गतीचा पाया देशाच्या  शैक्षणिक योजनांमध्ये असतो.  या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी  रूप पालटू शिक्षणाचे या उद्दिष्टाने हा जगन्नाथाचा रथ ओढणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्था, त्यांचे कार्यकर्ते भारतभर पसरले आहेत. अशा शिक्षण संस्थांपैकी एक - ज्ञान प्रबोधिनी.

ज्ञान प्रबोधिनीच्या शिक्षण प्रणालीतील  जेवणदायी शिक्षण व जीवनदायी शिक्षण या दोन्हीचा विचार आणि  त्याबद्दल दीर्घकाळ शैक्षणिक प्रयोग करून ज्ञान प्रबोधिनीच्या शिक्षण प्रणालीच्या घटकांचा अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शाळांपर्यंत विस्तार करण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली : ‘भारतीय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी चळवळ ! भारतीय शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी चळवळ !! आणि शैक्षणिक रचनांची गुणवत्ता वाढवण्यासाठी चळवळ !!!’ सुरू झाली त्या प्रा. विवेकराव पोंक्षेसरांचे शैक्षणिक चिंतन शिक्षण व्हावे चैतन्यदायी या पुस्तकात संकलित केले आहेत .शिक्षण व्हावे चैतन्यदायी या पुस्तकाचे ऑक्टोबर महिन्यात प्रकाशन करण्यात आले.

सुमारे ३५ वर्ष स्वतः मधील प्रयोगशीलता जपत ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रयोगांची रचना व नेतृत्व करणाऱ्या विवेकराव पोंक्षेसरांच्या शिक्षण विषयक सूत्रांचे व शैक्षणिक प्रयोगांच्या अनुभवांचे   संकलन या पुस्तकात केले आहे.  शिक्षण विचार, कृतिशील शिक्षण आणि  प्रशिक्षक मासिकातील शिक्षकांबरोबरचा संपादकीय संवाद या तीन शीर्षकाखाली  पुस्तकात लेखन संकलित केले  आहे. पुस्तकातील भाग चार 'घडता घडविताना' हे अनुभव कथनात्मक व्यक्तिदर्शन घडवणारे निवेदन आहे 

मूर्त अनुभवातून अमूर्त विचारांकडे विद्यार्थ्यांचा प्रवास घडवायचा असेल तर अध्यापक कल्पक आणि प्रयोगशील असला पाहिजे. औपचारिक रचनेतील अनुभवापासून खुल्या अनुभवांपर्यंत ज्यात संकल्पनांपासून समाजापर्यंत जाणीव विस्तारणाऱ्या अनुभवांची रचना ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमध्ये विवेकरावांच्या नेतृत्वाखाली विकसित झाली.  सहाध्याय दिन, सरस्वती पूजना, विक्री उपक्रम या सारख्या कृतिशील शिक्षणासाठीच्या उपक्रमांचा परिचय ‘कृतिशील शिक्षण’ या भागातील आठ लेखांमध्ये करून घेता येईल.

या शैक्षणिक प्रयोगांमधून जे मूर्त विचारसूत्र दीर्घकाळच्या प्रयोगशील चिंतनातून विकसित झाले अशा शिक्षणविचारांचा परिचय पुस्तकाच्या पहिल्या भागातील : ‘शिक्षण विचार’ मधील  अध्ययन अनुभवातून ज्ञाननिर्मिती, वैज्ञानिक दृष्टीकोन, कलारसास्वाद, मुक्त विद्या केंद्र या लेखांमध्ये संकलित केला आहे.

पोंक्षेसर शिक्षणक्षेत्राकडे मनुष्य घडणीची प्रयोगशाळा म्हणून पाहात. समृद्ध शिक्षणातून समर्थ भारत घडवायचा असेल तर हे एकट्याचे काम नाही तर त्यासाठी शिक्षणक्षेत्रातील प्रयोगशील प्रतिभासंपन्न अध्यापकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, त्यांचे संघटित प्रयत्नच हे स्वप्न साकारू शकतात याची जाण असल्याने पोंक्षेसरांनी अशा शिक्षकांसाठी विचार आणि शैक्षणिक प्रयोगांचे आदानप्रदान करण्याचे व्यासपीठ म्हणून प्रशिक्षक मासिक सुरू केले. या मासिकाच्या संपादकीय पानावरून शिक्षकांशी केलेला संवाद म्हणजे या मनुष्यघडणीच्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या अध्यापक संशोधकांशी या स्वप्नाबद्दल केलेला मुक्त संवाद आहे. असे काही निवडक संवाद प्रशिक्षकाच्या ‘संपादकीय पानावरून’ या पुस्तकाच्या भाग तीनमध्ये संकलित केले आहेत.

एखादी व्यक्ती समजून घ्यायची असेल तर तिच्या घडणीच्या  कालखंडाचा आढावा घ्यावा लागतो. पण आय एम टीचर बाय चॉइस, नॉट बाय चान्सअसे जाणीवपूर्वक ठरवून शिक्षण क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या शिक्षकाचा आचार आणि विचार समजून घ्यायचा असेल तर तिचा ‘घडता-घडविताना’चा विचार आणि अनुभव पुस्तकाच्या चौथ्या भागात संकलित केले आहेत. एमकेसीएलने महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञांच्या घेतलेल्या मुलाखतींमधील विवेकराव पोंक्षेसरांची दीर्घ मुलाखत त्यांच्यातील अध्यापक, पालक, कल्याणमित्र, अभ्यासक अशा विविध रूपांचे दर्शन देणारी आणि प्रेरणा जागरण करणारी आहे.

पोंक्षेसर नेहमी म्हणत, ‘ मोटिव्हेशन फर्स्ट ! आनंददायी शिक्षणाचा अर्थ शिक्षण सोपे करणे नसून, शिक्षण कितीही अवघड असले तरी त्यासाठी कष्ट घेताना आनंद वाटणे हाच होय. शिक्षकाचे आपल्या विद्यार्थ्यावर खूप प्रेम हवे. ती आनंददायी शिक्षणाची पहिली पायरी आहे. शिक्षकाने फक्त आपल्या विषयात रममाण होऊन चालणार नाही तर त्याचे अध्यापन विद्यार्थीकेन्द्री असले पाहिजे. असा शिक्षक ज्याने स्वतःचे भावविश्व विद्यार्थ्यांना खुले करून दिले आहे त्याचा प्रवास शिक्षकाकडून गुरूकडे होतो.असा एका शिक्षकाचा आचार्यत्वाच्या दिशेनं झालेला प्रवास जाणून घेण्यासाठी जरूर वाचा : शिक्षण व्हावे चैतन्यदायी

या पुस्तकाबरोबरच ज्ञान प्रबोधिनीतील विविध  शैक्षणिक प्रयोगांचा आणि  शैक्षणिक साहित्याचा परिचय करून घेत आपण शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याच्या ज्ञान प्रबोधिनीच्या चळवळ सदस्य होऊ शकता. या दृष्टीने या महिन्यापासून ज्ञान प्रबोधिनीतील शैक्षणिक प्रकाशने आपण आता  http://jpprakashane.org वर  ऑनलाईन खरेदी करू शकता. प्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रकाशनांचा परिचय करून घेण्यासाठी वरील संकेतस्थळाला जरूर भेट द्या.

शिक्षण व्हावे चैतन्यदायी : पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.  




Comments

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

सहपुस्तक चाचणी

  सहपुस्तक चाचणी                मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे ; दूरचित्रवाणीवर दहावी , बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या , चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो ? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी... ? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात , स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात , पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी... ?              माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले , ' अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका. ' मी विचारले , का ? काय झाले ? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्या...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...