Skip to main content

भारताचे संविधान : संविधान दिनानिमित्त विद्यार्थांसाठी कार्यपत्रिका

 भारताचे संविधान 

संविधान दिनानिमित्त विद्यार्थांसाठी कार्यपत्रिका 

आपण शाळेत प्रार्थनेच्या वेळी नियमितपणे राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, वंदेमातरम आणि  भारताच्या संविधानाची उद्देशिका याचे पठण करतो. या कार्यपत्रिकेत आपण भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेची  माहिती करून घेताना  हे संविधान कसे तयार झाले, कोणी तयार केले, संविधान  निर्मितीची प्रक्रिया कशी होती याचा परिचय करून घेणार आहोत. 

२६ नोव्हेंबर आपण भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करतो. संविधान दिवसापर्यंत खाली दिलेल्या कृती करत भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचा  परिचय करून घेवू या .

कृती. १ : 

राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, वंदेमातरम आणि  भारताच्या संविधानाची उद्देशिका यापैकी एक ज्याचे रोज  शाळेत रोज ज्याचे पठाण केले जाते  ते पुस्तकात न बघता वहीत लेखन करा.

कृती २ : 

भारतीय स्वातंत्र्य आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना याचे नाते उलगडून सांगणारी ‘ इंडिया : द स्पिरीट ऑफ फ्रिडम’ छोट्या फिल्मची लिंक खाली देत आहे. फिल्म बघून झाल्यावर आवडली तर आपल्या एका मित्राला शेअर करा आणि त्याच्या बरोबर  त्या फिल्ममधील  काय आवडले, काय समजले या बद्दल मित्राशी  व्हॉट्स अॅप, मेसेंजर वर गप्पा मारा आणि तो संवाद शिक्षकांना शेअर करा.

India : The Spirit of Freedom  


 कृती ३ : 

भारताच्या संविधानाची  मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील उद्देशिका सोबत दिली आहे. त्याचे वाचन करून खाली दिलेला तक्ता पूर्ण करा. ( पहिल्या तीन ओळीत नमुना शब्द दिले आहेत. त्याला समांतर शब्द शोधायचे आहेत. शेवटच्या तीन ओळींसाठी शब्द निवडायचे आहेत )




            

मराठी

हिंदी

इंग्रजी

लोकशाही

लोकतंत्रात्मक

Democratic

सार्वभौम

 

 

 

स्वतंत्रता

 

 

 

Equality

 

 

 

 

 

 

 

 

 

कृती ४ : खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

  1.  खाली दिलेल्या रकान्यांमध्ये स्वातंत्र्य या शब्दाशी निगडीत असणारे शब्द भरून 

                  तक्ता पूर्ण  करा.


       
          
        2. खालील चित्र भारताच्या संविधानाच्या कोणत्या मूल्याशी निगडीत आहे? या मूल्याबद्दल                  उद्देशिकेमध्ये काय म्हटले आहे?

                              


                3. ही उद्देशिका कोणी कोणाला अर्पित केली आहे ?

                              4.  उद्देशिकेमधील व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता' या दोन घटकांचा कोणत्याही एका                  मूल्यासंदर्भात अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.  

कृती ५

            राज्यसभेच्या यु-ट्यूब चॅनेलवर २०१४ साली राज्यसभेच्या दूरदर्शन  चॅनेलवर प्रसारित झालेल्या दहा भागांची धारावाही उपलब्ध आहे.  नागरिक शास्त्रातील अनेक संकल्पना, भारतीय घटनेतील अनेक तरतुदी कशा निश्चित केल्या हे दाखवण्यासाठी हे भाग उपयोगी आहेत. संविधान : मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टीट्युशन या मालिकेचे दिग्दर्शन शाम बेनेगल यांनी केले आहे. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये ही मालिका उपलब्ध आहे. त्यातील दहावा भाग बघताना खालील मुद्यांच्या आधारे नोंदी करा. -  

संविधान : भाग 10

  1.     उद्देशिकेवरील चर्चेत कोणत्या ऐतिहासिक नेत्यांनी सहभाग घेतला?
  2. उद्देशिकेमध्ये कोणकोणते बदल सुचवण्यात आले?
  3. उद्देशिकेमधील कोणकोणत्या शब्दांवर चर्चा झाली? का?
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणाचे सार तुमच्या शब्दात लिहा.

भाग

शीर्षक

1

The First Step: Cabinet Mission To Objectives Resolution

2

Independence: A Divided Legacy

3

Independent India: Righting Fundamental Wrongs with Fundamental Rights 

4

People's Rights, Principles of Governance and Duties

5

Strengthening The Weak: Minority, Women and Backward Rights

6

Whose Land Is It?: Land Reforms And Acquisition

7

Link Language: Hindi Or Hindustani?

8

Federalism: Linking The States And The Centre

9

Three Pillars: Executive, Legislature, Judiciary

10

From Preamble to the Final Draft and beyond



शिक्षकांसाठी : आठवीच्या पुस्तकाचे शीर्षक इतिहास व नागरिकशास्त्र आहे आणि दहावीच्या पुस्तकाचे शीर्षक इतिहास व राज्यशास्त्र असे का आहे?  

                 प्रशांत दिवेकर 

            ज्ञान प्रबोधिनी, पुणे 










Comments

  1. खूप छान प्रकारे विद्यार्थ्यांना माहिती मिळेल. वाचन, चर्चा घडून येईल.

    ReplyDelete
  2. Very apt precisely explained,👍👌

    ReplyDelete
  3. सर,खूपच स्तुत्य उपक्रम.

    ReplyDelete
  4. Thank you Sir.. very thoughtful activities for children and a thought provoking question for teachers.

    ReplyDelete
  5. प्रशांत सर, खूपच उपयुक्त कृतिपत्रक

    ReplyDelete
  6. खऱ्या अर्थाने विचार प्रक्रियेला संधी अन् विचार पोहचवण्याचा मार्ग.

    ReplyDelete
  7. सर, फारच उपयुक्त आणि परिणामकारक

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Nation in Image: Symbols that Shape Nations

                                                          Symbols that Shape Nations This activity introduces students to how nations use visual symbols and personifications to express identity, unity, and political values. By examining global examples and comparing them with Abanindranath Tagore’s Bharat Mata, learners explore how imagery shapes nationalism and deepen their understanding of the Bharatiya concept of Rāṣṭra. Identify images and by using references complete the table   (Support Independent Learning, Comparison & analysis) 2.  Compare the above images with Abanindranath Tagore’s image of Bharat Mata. How does it reflect Indian values? (Analysis & synthesis) 3.  How does the practice of personifying nations—often through female figures—shape our understandin...

आ. कै. उषाताईंबद्दल .....

  आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये   एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल ,   थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी   प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव , उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , " आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक , सहली , शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत   आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा. त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलाप...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...