Skip to main content

भारताचे संविधान : संविधान दिनानिमित्त विद्यार्थांसाठी कार्यपत्रिका

 भारताचे संविधान 

संविधान दिनानिमित्त विद्यार्थांसाठी कार्यपत्रिका 

आपण शाळेत प्रार्थनेच्या वेळी नियमितपणे राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, वंदेमातरम आणि  भारताच्या संविधानाची उद्देशिका याचे पठण करतो. या कार्यपत्रिकेत आपण भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेची  माहिती करून घेताना  हे संविधान कसे तयार झाले, कोणी तयार केले, संविधान  निर्मितीची प्रक्रिया कशी होती याचा परिचय करून घेणार आहोत. 

२६ नोव्हेंबर आपण भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करतो. संविधान दिवसापर्यंत खाली दिलेल्या कृती करत भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचा  परिचय करून घेवू या .

कृती. १ : 

राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, वंदेमातरम आणि  भारताच्या संविधानाची उद्देशिका यापैकी एक ज्याचे रोज  शाळेत रोज ज्याचे पठाण केले जाते  ते पुस्तकात न बघता वहीत लेखन करा.

कृती २ : 

भारतीय स्वातंत्र्य आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना याचे नाते उलगडून सांगणारी ‘ इंडिया : द स्पिरीट ऑफ फ्रिडम’ छोट्या फिल्मची लिंक खाली देत आहे. फिल्म बघून झाल्यावर आवडली तर आपल्या एका मित्राला शेअर करा आणि त्याच्या बरोबर  त्या फिल्ममधील  काय आवडले, काय समजले या बद्दल मित्राशी  व्हॉट्स अॅप, मेसेंजर वर गप्पा मारा आणि तो संवाद शिक्षकांना शेअर करा.

India : The Spirit of Freedom  


 कृती ३ : 

भारताच्या संविधानाची  मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील उद्देशिका सोबत दिली आहे. त्याचे वाचन करून खाली दिलेला तक्ता पूर्ण करा. ( पहिल्या तीन ओळीत नमुना शब्द दिले आहेत. त्याला समांतर शब्द शोधायचे आहेत. शेवटच्या तीन ओळींसाठी शब्द निवडायचे आहेत )




            

मराठी

हिंदी

इंग्रजी

लोकशाही

लोकतंत्रात्मक

Democratic

सार्वभौम

 

 

 

स्वतंत्रता

 

 

 

Equality

 

 

 

 

 

 

 

 

 

कृती ४ : खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

  1.  खाली दिलेल्या रकान्यांमध्ये स्वातंत्र्य या शब्दाशी निगडीत असणारे शब्द भरून 

                  तक्ता पूर्ण  करा.


       
          
        2. खालील चित्र भारताच्या संविधानाच्या कोणत्या मूल्याशी निगडीत आहे? या मूल्याबद्दल                  उद्देशिकेमध्ये काय म्हटले आहे?

                              


                3. ही उद्देशिका कोणी कोणाला अर्पित केली आहे ?

                              4.  उद्देशिकेमधील व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता' या दोन घटकांचा कोणत्याही एका                  मूल्यासंदर्भात अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.  

कृती ५

            राज्यसभेच्या यु-ट्यूब चॅनेलवर २०१४ साली राज्यसभेच्या दूरदर्शन  चॅनेलवर प्रसारित झालेल्या दहा भागांची धारावाही उपलब्ध आहे.  नागरिक शास्त्रातील अनेक संकल्पना, भारतीय घटनेतील अनेक तरतुदी कशा निश्चित केल्या हे दाखवण्यासाठी हे भाग उपयोगी आहेत. संविधान : मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टीट्युशन या मालिकेचे दिग्दर्शन शाम बेनेगल यांनी केले आहे. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये ही मालिका उपलब्ध आहे. त्यातील दहावा भाग बघताना खालील मुद्यांच्या आधारे नोंदी करा. -  

संविधान : भाग 10

  1.     उद्देशिकेवरील चर्चेत कोणत्या ऐतिहासिक नेत्यांनी सहभाग घेतला?
  2. उद्देशिकेमध्ये कोणकोणते बदल सुचवण्यात आले?
  3. उद्देशिकेमधील कोणकोणत्या शब्दांवर चर्चा झाली? का?
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणाचे सार तुमच्या शब्दात लिहा.

भाग

शीर्षक

1

The First Step: Cabinet Mission To Objectives Resolution

2

Independence: A Divided Legacy

3

Independent India: Righting Fundamental Wrongs with Fundamental Rights 

4

People's Rights, Principles of Governance and Duties

5

Strengthening The Weak: Minority, Women and Backward Rights

6

Whose Land Is It?: Land Reforms And Acquisition

7

Link Language: Hindi Or Hindustani?

8

Federalism: Linking The States And The Centre

9

Three Pillars: Executive, Legislature, Judiciary

10

From Preamble to the Final Draft and beyond



शिक्षकांसाठी : आठवीच्या पुस्तकाचे शीर्षक इतिहास व नागरिकशास्त्र आहे आणि दहावीच्या पुस्तकाचे शीर्षक इतिहास व राज्यशास्त्र असे का आहे?  

                 प्रशांत दिवेकर 

            ज्ञान प्रबोधिनी, पुणे 










Comments

  1. खूप छान प्रकारे विद्यार्थ्यांना माहिती मिळेल. वाचन, चर्चा घडून येईल.

    ReplyDelete
  2. Very apt precisely explained,👍👌

    ReplyDelete
  3. सर,खूपच स्तुत्य उपक्रम.

    ReplyDelete
  4. Thank you Sir.. very thoughtful activities for children and a thought provoking question for teachers.

    ReplyDelete
  5. प्रशांत सर, खूपच उपयुक्त कृतिपत्रक

    ReplyDelete
  6. खऱ्या अर्थाने विचार प्रक्रियेला संधी अन् विचार पोहचवण्याचा मार्ग.

    ReplyDelete
  7. सर, फारच उपयुक्त आणि परिणामकारक

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

सहपुस्तक चाचणी

  सहपुस्तक चाचणी                मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे ; दूरचित्रवाणीवर दहावी , बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या , चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो ? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी... ? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात , स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात , पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी... ?              माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले , ' अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका. ' मी विचारले , का ? काय झाले ? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्या...

Reconstructing the Dockyard of Lothal

Activity: Reconstructing the Dockyard of Lothal               Lothal was one of the important cities of the Indus Valley Civilization, known for its remarkable dockyard, one of the earliest in the world. It shows how people of that time planned and built structures with great skill and understanding of their surroundings.               In this activity, you will observe the pictures of the Lothal Dockyard and imagine yourself as a planner responsible for its construction. You will think about the kind of information and decisions needed to build such a dockyard successfully. Through this, you will gain insight about abilities of ancient Indians.   Student Worksheet: Picture Analysis – The Dockyard of Lothal Learning Objective: To explore how ancient Indians combined knowledge from various fields and used researc...