Skip to main content

संपादकीय संवाद : १

 

संपादकीय संवाद : १

सस्नेह नमस्कार,

गेल्या महिन्यात एका शिक्षकांच्या गटासाठी प्रकल्प पद्धतीचा परिचय करून देण्यासाठी एक चार दिवसीय कार्यशाळा घेतली. कार्यशाळेत एका प्रश्नावर शिक्षकांना काम करायला दिले होते. प्रश्न समजून घेऊन आवश्यक उत्तर मिळवण्यासाठी काहीतरी गोळा करावे लागेल, मुलाखती घ्याव्या लागतील, सर्वेक्षण करावे लागेल, प्रयोग करावे लागतील अशा स्वरूपाचे प्रश्न ‘प्रकल्पाचा प्रश्न’ म्हणून दिले होते.

प्रश्नाचे स्वरूप समजेल व आकलन होईल अशी चर्चा झाल्यावर गटांना काम करण्यासाठी वेळ दिला होता. तास-दीड  तासाने गटांचे काम बघण्यासाठी गेलो तर काही गट नुसतेच बसलेले दिसले विचारले तर ‘सर, यासाठी सूक्ष्मदर्शक लागेल ? यासाठी पदार्थाची वेष्टने लागतील ? आमच्या प्रश्नांसाठी बटाटे लागणार आहेत ? असे प्रतिसाद आले. 

या प्रतिसादांवर ‘मग मिळवायला अडचण काय आहे आहे ? ‘ असे विचारल्यावर प्रतिसाद आले ‘ सूक्ष्मदर्शकासाठी प्रयोगशाळेपर्यंत जावे लागेल! रस्त्यावर पडलेली किंवा शाळेच्या कचरा कुंडीतील वेष्टने कशी उचलायची!! मेसमध्ये बटाटा मागितला आणि तेथील कर्मचारी देणार नाही म्हणाले तर !!!’

प्रतिसादांवरून लक्षात येते की  मला शिकण्यासाठी जे लागणार आहे ते मलाच मिळवावे लागेल, त्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागणार आहेत,  असा विचारच गटाने केला नव्हता.  जे लागेल ते कोणीतरी आणून देईल मग आम्ही  अभ्यास करू अशा विचारात गट होता.

शिकण्यासाठी एक स्थितीशीलता सोडून एका गतीशिलतेत प्रवेश करावा लागतो, एक सुखाची स्थिती ( कम्फर्ट झोन ) सोडावी लागते. असे ‘स्वयं’सूचनेने शिकण्यासाठी आवश्यक गतीशिलतेमध्ये प्रवेश करण्याचे अनुभव विद्यार्थ्यांना देता येतील का ? अशा अनुभवांमधून असे ‘स्वयं’सूचना देऊ शकतील असे स्वाध्यायी घडवता येईल का ?

जोनाथन लीव्हिंगस्टन सीगल या रिचर्ड बाख यांच्या पुस्तकातील सलिव्हानने जोनाथन दिलेला एक प्रतिसाद आठवतो. जोनाथानच्या यशाबद्दल अभिनंदन करताना  सलिव्हान म्हणतो, ‘ नाही जोन, तसं नाहीये. मी गेल्या दहा हजार वर्षात जे गल पक्षी पहिले, त्यात नवीन शिकण्याचं भय जवळजवळ नाही असा धाडसी तू एकच भेटलास!’

  अनुभव शिक्षणाची योजना करताना नवीन अनुभव घेण्यातील, नवीन शिकण्यातील आनंद घ्यायला विद्यार्थी शिकतील अशा अनुभवांची योजना करूया.

सस्नेह,

प्रशांत दिवेकर

( संपादकीय जानेवारी  २०२४)    

Comments

  1. आपण निर्माण केलेले प्रश्न फार महत्वाचे आहेत. अशी स्थितीशिलता हाच शिक्षण प्रक्रियेतील अडथळा जाणवतो. गतिशीलता निर्माण करावयाची झाल्यास परस्पर संवाद, प्रश्न निर्माण होणे, जिज्ञासा व ती जिज्ञासा जो पर्यंत शमवली जात नाही तो पर्यंत करावयाची धडपड निर्माण करता यायची असेल तर परस्पर संवाद व तितकी स्पेस या शालेय व्यवस्थेत निर्माण होणे देखील आवश्यक वाटते. परंतु असे तंत्र असल्यास जाणून घ्यायला देखील आवडेल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

सहपुस्तक चाचणी

  सहपुस्तक चाचणी                मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे ; दूरचित्रवाणीवर दहावी , बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या , चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो ? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी... ? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात , स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात , पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी... ?              माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले , ' अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका. ' मी विचारले , का ? काय झाले ? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्या...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...