Skip to main content

पुस्तक परिचय : कथा इस्रोची

कथा इस्रोची ( अर्थात भारतीय अंतराळ संशोधनाची )

अमूल’ द टेस्ट ऑफ इंडिया, हमारा बजाजबुलंद भारत की बुलंद तसबीर अशा अनेक जाहिराती आपल्या मनात घर करून आहेत. या कंपन्याची उत्पादने भारताच्या सहकार आणि उद्योग क्षेत्रातील यशोगाथा आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. स्वातंत्रोत्तर भारतात देशाबद्दल अस्मिता आणि अभिमान निर्माण होईल अशा विक्रम गाथांची, आदर्श प्रतिमांची उभारणी हे एक महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य होते.

         भारताची ओळख आणि अस्मिता याचे पुनर्निर्माण आणि नवनिर्माण करण्यासाटी सोमनाथ मंदिराच्या जिर्णोद्धारापासून ते कन्याकुमारीच्या विवेकानंद शिलास्मारकाची निर्मिती अशा अनेक घटनांचा विचार करावा लागेल. म्हणूनच पंडित नेहरूंनी भाक्रानांगल धरणाला भारताचे आधुनिक तीर्थ क्षेत्र संबोधले आहे.

डॉ. विक्रम साराभाई या ध्येयवेड्या शास्त्रज्ञाने भारताला अंतराळ संशोधनात अग्रेसर करायचे करण्याचे स्वप्न पहिले. १९६३ च्या नोव्हेंबर महिन्यात केरळच्या किनाऱ्यावरील ‘थुंबा’ या छोट्या खेड्यात अग्निबाण उडवण्यासाठी एक केंद्र स्थापन करण्यापासून ते आजच्या चांद्रयान, मंगळयान मोहिमेचे  यशोगान म्हणजे छात्र प्रबोधनद्वारा प्रकाशित डॉ. वसंतराव गोवारीकर लिखित ‘कथा इस्रोची’ अर्थात भारतीय अंतराळ संशोधनाची.

एक तरुण शास्त्रज्ञ ते देशातील अग्रणी संशोधन संस्थेचा कल्पक नेता या नात्याने डॉ. वसंतराव गोवारीकर या कथेचे प्रत्यक्ष सहभागी दर्शक आहेत. अशा प्रत्यक्षदर्शीने  या पुस्तकात विज्ञान तंत्रज्ञानाच्या एका क्षेत्रामधील भारताच्या अभिमानस्पद प्रगतीची सांगितलेली कहाणी म्हणजे ‘कथा इस्रोची.’

उच्च्य शिक्षण घेवून नव्या दमाने राष्ट्रीय कामात सहभागी होण्यासाठी आलेले वसंतराव गोवारीकर नव्यानेच सुरु झालेल्या अंतरीक्ष संशोधन संस्थेत रुजू झाले. या पुस्तकात त्यांनी विद्यार्थ्यांसमोर इस्रोने भारताला जगातील सहा प्रगत राष्ट्रांच्या रांगेत नेवून ठेवणारी कथा सांगितली आहे.  भारताची अंतरीक्ष संशोधन कार्यातील झेप खरोखरीच अचंबित करणारी आहे.

डॉ. विक्रम साराभाई ते डॉ. के. सिवन यांसारखे दूरदृष्टी  असलेले नेतृत्त्व, कामाशी समरसून गेलेले हजारो शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांच्या संघटीत प्रयत्नांमधून अवकाश संशोधन भारताने जी मुसंडी मारली त्या प्रवासाचे  प्रेरक दर्शन या पुस्तकात होते.

लेखकाची कामाबद्दलची आत्मीयता, दुसऱ्याचे गुण जाणण्याची क्षमता आणि सहज संपर्काची कला यामुळे या पुस्तकातील कथनशैली वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. अनुभवकथन शैलीत लिहिलेले हे  कथन विद्यार्थ्यानाच नव्हे तर सर्व वयोगटातील वाचकांना आवडेल आणि भव्य स्वप्ने पाहण्याची व ती साकारण्याची प्रेरणा देत राहतील.

ही कथा म्हणजे फक्त यशोगाथाच नाही तर या प्रवासातील अडथळे,अपयश यावर जिद्दीने केलेली मात याचेही  दर्शन आहे. लेखक समारोपात या प्रवासाचे ध्येय वाक्य सांगताना म्हणतात.

‘ऊठ, निराश नको होऊस. झगडत राहा.

आपल्या ध्येयाची कास नको सोडूस.

शरण जावू नकोस. हार मानू नकोस.

तुझा नाही कुणी पाडाव करू शकणार.

अखेर विजय आहे फक्त तुझाच !’

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे

पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकला भेट द्या

कथा इस्रोची



Comments

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरेतील मार्गदर्शक सिद्धांत

  पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरे तील मार्गदर्शक सिद्धांत अनुबन्ध चतुष्टय — ग्रंथलेखनाची चार पायाभूत तत्त्वे गेल्या आठवड्यात एका शिबिरासाठी सज्जनगड येथे जाण्याचा योग आला.   श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या कार्य आणि साधनेशी निगडित हे एक पवित्र स्थान आहे. तेथे विद्याव्रत संस्कार या विद्यार्थ्यांच्या संस्कार कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमार्फत आयोजित अभ्यास शिबिरात   सहभागी झालो होतो. ( विद्याव्रत संस्कार हा ज्ञान प्रबोधिनीद्वारा    विद्यार्थ्यांमध्ये “विद्यार्थीत्वाचे” गुण जागवण्यासाठी केला जाणारा शैक्षणिक संस्कार आहे. व्यक्ति विकासाच्या आयामांचा परिचय करून घेणे व विद्यार्थी जीवन काळात व्यक्तिमत्त्व विकसनासाठी आवश्यक अशा व्रतांचा परिचय करून घेवून   विद्या अध्ययनचा संकल्प करणे हे या शैक्षणिक संस्काराचे सूत्र आहे.   ) सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. सकाळच्या काकड्यापासून शेज आरतीपर्यंत एक निश्चित दिनक्रम तेथे आचाराला जातो. या दैनंदिन कार्यक्रमात प्रार्थना , अभिषेक–पूजन , महाप्रसाद , भजन आण...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...