Skip to main content

अक्षयवट

 अक्षयवट

गेल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातील संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी येथे मुख्याध्यापक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. निवासी शाळा, तंत्रशिक्षण शाळा, सैनिकी शाळा, कृषी विज्ञान केंद्र असे विविध शैक्षणिक आणि ग्राम विकासाचे काम संस्कृती संवर्धन मंडळामार्फत महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती तालुक्यात राबवले जातात.

दीड-दोनशे एकरात पसरलेल्या संस्कृती संवर्धन मंडळाच्या आवारात एक वेगळेच सभागृह पाहायला मिळाले ‘वसुंधरा सभागृह’. चार वर्षांपूर्वी या सभागृहात शाळेच्या दहावीच्या तुकडीच्या शुभेच्छा समारंभात सहभागी झालो होतो.

यावेळी या वटवृक्षाचे एक वेगळे पण लक्षात आले ते म्हणजे एवढा डेरेदार विस्तार असलेल्या या वडाच्या झाडाला पारंब्याच नाहीत.

 



सगरोळीतील महावृक्ष पाहिल्यावर २००५ मध्ये कोलकाता येथील वनस्पती उद्यानात पाहिलेला वृक्षराज आठवला. सुमारे २५० वर्ष आयष्य असलेला ह्या वृक्षराजाचा परीघ ४५० मीटर आहे. त्याला सुमारे २८८० पारंब्या आहेत. सर्वात उंच शाखा सुमारे 25 मीटर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वृक्षराजाचे मूळ मुख्य खोड १९२५ सालीच नष्ट झाले. मूळ स्थापक खोड नसले तरी आजही हा वृक्षराज विस्तारत आहेत. त्याची प्रत्येक पारंबी जोपासून जमिनीपर्यंत पोचेल अशी काळजी घेतली जाते.

  

अनेक संस्थाचे आणि संघटनांचे काम वटवृक्षासारखे विस्तीर्ण असते पण त्याला पारंब्याच नसतात. कालानुरूप नेतृत्व करणाऱ्या संस्थापक खोडाचे आयुष्य पूर्णत्वाकडे निघाल्यावर महावृक्ष वठत जातो किंवा वादळात हे वृक्ष उन्मळून पडतात.

काही वडाच्या झाडांना पारंब्या असतात पण त्या कधीच जमिनीपर्यंत पोचत नाहीत वा पोचून दिल्या जात नाहीत.

नांदुरकीसारखे काही वृक्ष दर्शनी वडासारखे असतात ते आकाराने मोठे असतात पण त्यांच्या पारंब्या मुळातच खुरट्याच असतात त्यामुळे ते डेरेदार असले तरी महावृक्ष होऊ शकत नाहीत.

पिंपळ, औदुंबर, आंबा यासारखे देववृक्ष विस्तीर्ण डेरेदार महावृक्ष असतात पण ते चिरायू नसतात. त्यांच्या आयुष्यात हे वृक्ष अनेकांसाठी आधारवट ठरतात.

कोलकाता येथील वनस्पती उद्यानातील वृक्षराज वटवृक्षासारख्या अनेक संघटना भारतभर पसरल्या आहेत. अशा महावृक्षाच्या पारंब्या त्या संघटनेला अक्षयवट बनवतात.

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे

कृपया ब्लॉग शेअर करताना ब्लॉगची लिंक अग्रेषित करावी म्हणजे वाचक त्यांचे प्रतिसाद थेट लेखकापर्यंत पोचवू शकतील. 



Comments

  1. अक्षयवड , आधरवड ..छान मांडणी

    ReplyDelete
  2. सर ,खूप छान वर्णन केले आहे तुम्ही ,असाच एक महाकाय वटवृक्ष संगमनेर नजीक पेमगिरी जवळ आहे.यातून आणखी 1 बोध होतो.खरी संघटना तीच ज्यात पारंब्या व खोड यात फरक सापडत नाही.

    ReplyDelete
  3. छान, सोप्या पध्दतीने समजावलेला विषय

    ReplyDelete
  4. खूप छान मांडणी!👌👍

    ReplyDelete
  5. खूप सुंदर वर्णन केलात सर

    ReplyDelete
  6. फारच छान मांडणी.... संकल्पना पण पटली आणि भावली.

    ReplyDelete
  7. खूप छान मांडणी👌

    ReplyDelete
  8. खूप छान मांडणी.. नेतृत्वाचा प्रवास आधारवड ते अक्षयवड व्हायला हवा... 🙏

    ReplyDelete
  9. खूपच छान मांडणी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

सहपुस्तक चाचणी

  सहपुस्तक चाचणी                मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे ; दूरचित्रवाणीवर दहावी , बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या , चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो ? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी... ? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात , स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात , पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी... ?              माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले , ' अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका. ' मी विचारले , का ? काय झाले ? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्या...

Reconstructing the Dockyard of Lothal

Activity: Reconstructing the Dockyard of Lothal               Lothal was one of the important cities of the Indus Valley Civilization, known for its remarkable dockyard, one of the earliest in the world. It shows how people of that time planned and built structures with great skill and understanding of their surroundings.               In this activity, you will observe the pictures of the Lothal Dockyard and imagine yourself as a planner responsible for its construction. You will think about the kind of information and decisions needed to build such a dockyard successfully. Through this, you will gain insight about abilities of ancient Indians.   Student Worksheet: Picture Analysis – The Dockyard of Lothal Learning Objective: To explore how ancient Indians combined knowledge from various fields and used researc...