Skip to main content

एक भेट : गौतमजी बजाज

                 मे महिन्यात शिक्षक प्रशिक्षण वर्गासाठी वर्ध्याला प्रवास झाला. संध्याकाळी सेवाग्राम आश्रम , पवनार आश्रम दर्शनाला गेलो होतो. एक संध्याकाळ पवनार आश्रम दर्शन व आ. गौतमजी बजाज यांच्या भेटीला आवर्जून गेलो होतो. आ. गौतमजी ज्ञान प्रबोधिनी-सोलापूरच्या द्विदशक पूर्तीच्या समारोपाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते. चार दिवस सोलापूर;हरळीला त्यांच्या सहवासाचा योग आला होता. 

                          त्यावेळी सोलापूरच्या शैक्षणिक उपक्रमांचा त्यांना परिचय करून देताना साहस शिबिरांबद्दल निवेदन केले. रॅपलिंग, घोडसवारी पासून सर्व उपक्रमांचे तपशील सांगितले. गौतमजींनी उपक्रमांचे तपशील प्रश्नोत्तरात जाणून घेतले. या उपक्रमातून साहस, वीर रस विकसित होईल या बद्दल कौतुक केले .
शेवटी त्यांनी एक प्रश्न विचारला " आपल्याला प्रबोधिनीत मुलांना साहसी बनवायचे आहे का निर्भय ? "
त्यांच्या या प्रश्नाने एखाद्या उपक्रमाचा हेतू उद्दिष्ट  ठरवताना विचार करायची वेगळी चौकट मला सापडली.
गेल्या 7-8 वर्षात या बद्दल झालेल्या विचारावर तासभर गौतमजींबरोबर छान गप्पा झाल्या .

            गौतमजी खरंतर " द बजाज " कुटुंबातील, 1951 साली विनोबांनी लँड रिफार्मचा खास भारतीय अध्यात्मिक प्रयोग सुरू केला " भूदान यात्रा " ! गौतमजी यावेळी 13 वर्षांचे होते. विनोबांनी या 13 वर्षाच्या गौतमला बरोबर येणार का विचारले. काही महिने हा प्रवास असेल असा विचार करून गौतमजींच्या कुटूंबाने त्यांना विनोबांबरोबर जाण्यास परवानगी दिली. काही महिन्यासाठी  विनोबांबरोबर सुरु झालेली ही यात्रा 13 वर्ष चालली  आणि या प्रवासात गौतमजी आयुष्यभरासाठी व्रतस्थ गांधीवादी झाले. गप्पांमध्ये विनोबांबरोबरच्या आठवणींपासून आजच्या परिस्थितीबद्दल बोलताना त्यांचा अध्यात्मिक विचार व शाश्वत विकासाचे त्याचे भारतीय प्रतिमान यांचे दर्शन होत होते. 

गौतमजींच्या या प्रवासाबद्दल त्यांच्या दोन मुलाखती उपलब्ध आहेत

              वयानुसार आठवण कमी आहे म्हणताना उपनिषद विचारापासून प्रबोधिनितील सर्वांची नावे व त्यांचे  उपक्रमाबद्दल त्यांना तपशिलात आठवण होती. व्यक्ती विकासापासून नेतृत्व विकासनापर्यंत बाहेरून प्रशिक्षण देण्यापेक्षा आतून याची प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये कशी निर्माण करता येईल याबद्दल बऱ्याच गोष्टीवरचा त्याचा विचार त्यांनी मांडला.

              आज आश्रमातील साधकांचे सरासरी वय 75 आहे. सत्याचा शोध घेण्यासाठी सत्याचे प्रयोग करणारे साधक आधीच दुर्मिळ आहेत , त्यांचा हा जीवन साधना प्रवास जाणून घेण्यासाठी वर दिलेल्या लिंकमधील गौतमजींची मुलाखती  जरूर पहा.

प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी
मे २०१८

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरु परंपरा

वंदे गुरु परंपरा गुरुपौर्णिमा   अर्थात   ज्ञानाच्या   परंपरांचे   पाईक   होण्याचा   दिवस इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) भगवद् गीतेत देखील श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानाच्या परंपरेचा दाखला दिला आहे. ते म्हणतात ‘ मी हा अव्यय ( अविनाशी ) योग सूर्याला सांगितला. सूर्याने मनुला सांगितला व मनूने  इक्ष्वाकू   सांगितला.  भारतीय परंपरेत नवीन ज्ञानतत्वाज्ञाच्या शाखांची मांडणी करताना देखील असा गुरु परंपरेचा वारसा सांगितला जातो. कारण ज्ञानाच्या परंपरेच्या संक्रमणातूनच ज्ञान वृद्धिगत होत जाते.                ज्ञान   प्रबोधिनीने   पथकाधिपती   म्हणून   समर्थ   रामदास ,  स्वामी   दयानंद ,  स्वामी   विवेकानंद   आणि   योगी   अरविंद या चार व्यक्तींचा स्वीकार केला आहे.   त्यापैकी एक म्हणजे समर्थ रामदास! कवि   वामन   पंडितांनी   समर्थांची ...

Vande Guru Parampara

  Vande Guru Parampara Guru Purnima – Honouring Our Gurus, Upholding the Tradition इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) In the Bhagavad Gita, while advising Arjuna, Lord Krishna gives an example of the tradition of knowledge. He says, “I imparted this indestructible Yoga to the Sun (Vivasvan), who passed it on to Manu, and Manu, in turn, passed it on to Ikshvaku.” In the Indian tradition, whenever new knowledge or philosophy is presented, the legacy of the Guru's tradition is also acknowledged—because knowledge flourishes only when its lineage is preserved and passed on. Jnana Prabodhini has accepted four great personalities—Samarth Ramdas, Swami Dayananda, Swami Vivekananda, and Yogi Arvind—as its visionaries, and pathfinders who have shaped Jnana Prabodhini ideals and direction. Today, let us learn about Samarth Ramdas. The poet Vaman Pandit praises him with the following verse. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे...

महाराष्ट्रधर्म

                                                                                       महाराष्ट्रधर्म १९९९ साली महिनाभराच्या ईशान्य भारत दौऱ्यात गुवाहाटी येथे केशवधाम कार्यालयात पूर्वांचलातील कामांचा परिचय करून घेण्यासाठी गेलो होतो. ज्यांना भेटायचे होते त्यांची वाट पाहत कार्यालयात बसलो होतो. एक आजोबा कार्यालयात डोकावले. बाहेरचे पाहुणे आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी , “ कुठून आलात ? किती दिवस प्रवास आहे ? काय काय पाहिले ?” अशी चौकशी केली. महाराष्ट्रातून आलो आहोत हे कळल्यावर त्यांनी आम्हाला विचारले , “ तुम्ही रायगडावर जाऊन आला आहात का ?” आम्ही “हो , रायगड पाहिला आहे ,” असे सांगितल्यावर त्या आजोबांनी एकदम आम्हाला साष्टांग नमस्कार केला. आम्ही गोंधळलो. “काय झाले ?” म्हणून त्यांना   विचारले. मग आमच्या शेजारी बसत फालूदा   म्...