Skip to main content

एक भेट : गौतमजी बजाज

                 मे महिन्यात शिक्षक प्रशिक्षण वर्गासाठी वर्ध्याला प्रवास झाला. संध्याकाळी सेवाग्राम आश्रम , पवनार आश्रम दर्शनाला गेलो होतो. एक संध्याकाळ पवनार आश्रम दर्शन व आ. गौतमजी बजाज यांच्या भेटीला आवर्जून गेलो होतो. आ. गौतमजी ज्ञान प्रबोधिनी-सोलापूरच्या द्विदशक पूर्तीच्या समारोपाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते. चार दिवस सोलापूर;हरळीला त्यांच्या सहवासाचा योग आला होता. 

                          त्यावेळी सोलापूरच्या शैक्षणिक उपक्रमांचा त्यांना परिचय करून देताना साहस शिबिरांबद्दल निवेदन केले. रॅपलिंग, घोडसवारी पासून सर्व उपक्रमांचे तपशील सांगितले. गौतमजींनी उपक्रमांचे तपशील प्रश्नोत्तरात जाणून घेतले. या उपक्रमातून साहस, वीर रस विकसित होईल या बद्दल कौतुक केले .
शेवटी त्यांनी एक प्रश्न विचारला " आपल्याला प्रबोधिनीत मुलांना साहसी बनवायचे आहे का निर्भय ? "
त्यांच्या या प्रश्नाने एखाद्या उपक्रमाचा हेतू उद्दिष्ट  ठरवताना विचार करायची वेगळी चौकट मला सापडली.
गेल्या 7-8 वर्षात या बद्दल झालेल्या विचारावर तासभर गौतमजींबरोबर छान गप्पा झाल्या .

            गौतमजी खरंतर " द बजाज " कुटुंबातील, 1951 साली विनोबांनी लँड रिफार्मचा खास भारतीय अध्यात्मिक प्रयोग सुरू केला " भूदान यात्रा " ! गौतमजी यावेळी 13 वर्षांचे होते. विनोबांनी या 13 वर्षाच्या गौतमला बरोबर येणार का विचारले. काही महिने हा प्रवास असेल असा विचार करून गौतमजींच्या कुटूंबाने त्यांना विनोबांबरोबर जाण्यास परवानगी दिली. काही महिन्यासाठी  विनोबांबरोबर सुरु झालेली ही यात्रा 13 वर्ष चालली  आणि या प्रवासात गौतमजी आयुष्यभरासाठी व्रतस्थ गांधीवादी झाले. गप्पांमध्ये विनोबांबरोबरच्या आठवणींपासून आजच्या परिस्थितीबद्दल बोलताना त्यांचा अध्यात्मिक विचार व शाश्वत विकासाचे त्याचे भारतीय प्रतिमान यांचे दर्शन होत होते. 

गौतमजींच्या या प्रवासाबद्दल त्यांच्या दोन मुलाखती उपलब्ध आहेत

              वयानुसार आठवण कमी आहे म्हणताना उपनिषद विचारापासून प्रबोधिनितील सर्वांची नावे व त्यांचे  उपक्रमाबद्दल त्यांना तपशिलात आठवण होती. व्यक्ती विकासापासून नेतृत्व विकासनापर्यंत बाहेरून प्रशिक्षण देण्यापेक्षा आतून याची प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये कशी निर्माण करता येईल याबद्दल बऱ्याच गोष्टीवरचा त्याचा विचार त्यांनी मांडला.

              आज आश्रमातील साधकांचे सरासरी वय 75 आहे. सत्याचा शोध घेण्यासाठी सत्याचे प्रयोग करणारे साधक आधीच दुर्मिळ आहेत , त्यांचा हा जीवन साधना प्रवास जाणून घेण्यासाठी वर दिलेल्या लिंकमधील गौतमजींची मुलाखती  जरूर पहा.

प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी
मे २०१८

Comments

Popular posts from this blog

Talk on Bhartiya Heritage of Educational Practices @ International Conference on Interpreting Cultures and Traditions: Shifting the Lenses

                                                    Talk on Indian Knowledge System : Bhartiya Heritage of Educational Practices   & Relevance in Contemporary Society   @ International Conference on Interpreting Cultures and Traditions:   Shifting the Lenses RIWATCH, Arunachal Pradesh   19-21 December 2025 I feel honoured to speak today as a plenary speaker at this international conference, Interpreting Cultures and Traditions – Shifting the Lenses, on Indian Knowledge Systems, especially traditional modes of knowledge transmission and their relevance in contemporary society. This session on Bharatiya Heritage of Educational Practices is being organised here at the RIWATCH campus. Standing at this podium today, I can recall the journey of RIWATCH—how it has grown ste...

पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरेतील मार्गदर्शक सिद्धांत

  पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरे तील मार्गदर्शक सिद्धांत अनुबन्ध चतुष्टय — ग्रंथलेखनाची चार पायाभूत तत्त्वे गेल्या आठवड्यात एका शिबिरासाठी सज्जनगड येथे जाण्याचा योग आला.   श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या कार्य आणि साधनेशी निगडित हे एक पवित्र स्थान आहे. तेथे विद्याव्रत संस्कार या विद्यार्थ्यांच्या संस्कार कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमार्फत आयोजित अभ्यास शिबिरात   सहभागी झालो होतो. ( विद्याव्रत संस्कार हा ज्ञान प्रबोधिनीद्वारा    विद्यार्थ्यांमध्ये “विद्यार्थीत्वाचे” गुण जागवण्यासाठी केला जाणारा शैक्षणिक संस्कार आहे. व्यक्ति विकासाच्या आयामांचा परिचय करून घेणे व विद्यार्थी जीवन काळात व्यक्तिमत्त्व विकसनासाठी आवश्यक अशा व्रतांचा परिचय करून घेवून   विद्या अध्ययनचा संकल्प करणे हे या शैक्षणिक संस्काराचे सूत्र आहे.   ) सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. सकाळच्या काकड्यापासून शेज आरतीपर्यंत एक निश्चित दिनक्रम तेथे आचाराला जातो. या दैनंदिन कार्यक्रमात प्रार्थना , अभिषेक–पूजन , महाप्रसाद , भजन आण...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...