Skip to main content

एक भेट : गौतमजी बजाज

                 मे महिन्यात शिक्षक प्रशिक्षण वर्गासाठी वर्ध्याला प्रवास झाला. संध्याकाळी सेवाग्राम आश्रम , पवनार आश्रम दर्शनाला गेलो होतो. एक संध्याकाळ पवनार आश्रम दर्शन व आ. गौतमजी बजाज यांच्या भेटीला आवर्जून गेलो होतो. आ. गौतमजी ज्ञान प्रबोधिनी-सोलापूरच्या द्विदशक पूर्तीच्या समारोपाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते. चार दिवस सोलापूर;हरळीला त्यांच्या सहवासाचा योग आला होता. 

                          त्यावेळी सोलापूरच्या शैक्षणिक उपक्रमांचा त्यांना परिचय करून देताना साहस शिबिरांबद्दल निवेदन केले. रॅपलिंग, घोडसवारी पासून सर्व उपक्रमांचे तपशील सांगितले. गौतमजींनी उपक्रमांचे तपशील प्रश्नोत्तरात जाणून घेतले. या उपक्रमातून साहस, वीर रस विकसित होईल या बद्दल कौतुक केले .
शेवटी त्यांनी एक प्रश्न विचारला " आपल्याला प्रबोधिनीत मुलांना साहसी बनवायचे आहे का निर्भय ? "
त्यांच्या या प्रश्नाने एखाद्या उपक्रमाचा हेतू उद्दिष्ट  ठरवताना विचार करायची वेगळी चौकट मला सापडली.
गेल्या 7-8 वर्षात या बद्दल झालेल्या विचारावर तासभर गौतमजींबरोबर छान गप्पा झाल्या .

            गौतमजी खरंतर " द बजाज " कुटुंबातील, 1951 साली विनोबांनी लँड रिफार्मचा खास भारतीय अध्यात्मिक प्रयोग सुरू केला " भूदान यात्रा " ! गौतमजी यावेळी 13 वर्षांचे होते. विनोबांनी या 13 वर्षाच्या गौतमला बरोबर येणार का विचारले. काही महिने हा प्रवास असेल असा विचार करून गौतमजींच्या कुटूंबाने त्यांना विनोबांबरोबर जाण्यास परवानगी दिली. काही महिन्यासाठी  विनोबांबरोबर सुरु झालेली ही यात्रा 13 वर्ष चालली  आणि या प्रवासात गौतमजी आयुष्यभरासाठी व्रतस्थ गांधीवादी झाले. गप्पांमध्ये विनोबांबरोबरच्या आठवणींपासून आजच्या परिस्थितीबद्दल बोलताना त्यांचा अध्यात्मिक विचार व शाश्वत विकासाचे त्याचे भारतीय प्रतिमान यांचे दर्शन होत होते. 

गौतमजींच्या या प्रवासाबद्दल त्यांच्या दोन मुलाखती उपलब्ध आहेत

              वयानुसार आठवण कमी आहे म्हणताना उपनिषद विचारापासून प्रबोधिनितील सर्वांची नावे व त्यांचे  उपक्रमाबद्दल त्यांना तपशिलात आठवण होती. व्यक्ती विकासापासून नेतृत्व विकासनापर्यंत बाहेरून प्रशिक्षण देण्यापेक्षा आतून याची प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये कशी निर्माण करता येईल याबद्दल बऱ्याच गोष्टीवरचा त्याचा विचार त्यांनी मांडला.

              आज आश्रमातील साधकांचे सरासरी वय 75 आहे. सत्याचा शोध घेण्यासाठी सत्याचे प्रयोग करणारे साधक आधीच दुर्मिळ आहेत , त्यांचा हा जीवन साधना प्रवास जाणून घेण्यासाठी वर दिलेल्या लिंकमधील गौतमजींची मुलाखती  जरूर पहा.

प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी
मे २०१८

Comments

Popular posts from this blog

Nation in Image: Symbols that Shape Nations

                                                          Symbols that Shape Nations This activity introduces students to how nations use visual symbols and personifications to express identity, unity, and political values. By examining global examples and comparing them with Abanindranath Tagore’s Bharat Mata, learners explore how imagery shapes nationalism and deepen their understanding of the Bharatiya concept of Rāṣṭra. Identify images and by using references complete the table   (Support Independent Learning, Comparison & analysis) 2.  Compare the above images with Abanindranath Tagore’s image of Bharat Mata. How does it reflect Indian values? (Analysis & synthesis) 3.  How does the practice of personifying nations—often through female figures—shape our understandin...

आ. कै. उषाताईंबद्दल .....

  आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये   एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल ,   थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी   प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव , उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , " आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक , सहली , शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत   आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा. त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलाप...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...