Skip to main content

मुझे जो जो चीज अच्छी आती हैं वो मैं सिखाऊंगा


                 
                        आसाममध्ये विवेकानंद केंद्राच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शोध परीक्षेसाठी अभ्यास वर्ग घेण्यासाठी मी आणि अमर परांजपे दिब्रुगडला गेलो होतो. अभ्यास वर्ग संपल्यानंतर विवेकानंद केंद्राच्या अरुणाचल प्रदेशमधील जयरामपूर येथील शाळेत केंद्रीय बोर्डाने नव्याने आणलेल्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेसमेंट या विषयासाठी शिक्षक आणि मुलांसाठी कार्यशाळा घेण्यासाठी जयरामपूरला गेलो होतो. 

              जयरामपूरजवळ पांगसू पास आहे. पांगसू पास ही खिंड भारत आणि म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेशाला जोडणारे सीमेवरचे ठिकाण आहे. भारत आणि म्यानमार याची सीमा निश्चित करणारा खुणेचा दगड या खिंडीच्या रस्त्यावर आहे.  येथे एक विशेष आठवडी बाजार भरतो.  बाजाराच्या दिवशी दोन्ही देशातील लोक परवाना काढून बाजारात येऊ शकतात आणि आपल्याला वस्तूंची खरेदी विक्री करू शकतात.  शासनाने  वस्तूंची एक यादी निश्चित केलेली आहे त्याची खरेदीविक्री होते. शेतमाल, भाजीपाला, स्थानिक कारागिरांच्या वस्तू देखील विक्रीसाठी असतात.   सीमेपलीकडील  लोकांना त्यांच्या देशातील मोठ्या बाजारात जायचे असेल तर काहीशे किलोमीटर प्रवास करावा लागतो, त्यापेक्षा त्यांना असा परवाना काढून भारतात येऊन खरेदी करणे सोयीचे जाते.  सीमेच्या दोन्ही बाजूंना अनेक गावांमध्ये एकमेकांचे नातेवाईक आहेत त्यांना पण त्या निमित्ताने एकमेकांना भेटत येते. 

              आम्ही जाणार होतो त्या दिवशी बाजार नसल्याने आम्हाला  परवाना मिळाला नाही.  पण आलोच आहोत तर बाजार नाहीतर किमान तो सीमा स्तंभ बघावा  म्हणून सकाळी लवकर उठलो आणि साडेचारच्या आसपास प्रवासाला सुरुवात केली.  आपल्याला माहिती आहे की आपण जसजसे पूर्वेकडेजावे  तसतसे लवकर उजाडते. अरुणाचलात उन्हाळ्यात सकाळी चारवाजता लख्ख उजाडलेले असते.  

                साधारण पाचसाडेपाच वाजले असतील पांगसू पासकडे जाताना वाटेतील नाम्पोंग लागले. ब्रह्मदेशाच्या सीमेजवळील हे शेवटचे मोठे गाव. गावातून जात असताना डाव्या बाजूला एक शाळा दिसली.  सरकारी शाळा होती. सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर  शाळेच्या व्हरांड्यात काही विद्यार्थी आणि एक शिक्षक योगासने करताना दिसली. शासकीय शाळेत एवढ्या सकाळी विद्यार्थी आणि शिक्षक काय करतात या उत्सुकतेपोटी गाडी थांबवली आणि  मागेवळून शाळेत गेलो. शिक्षक आणि त्यांचे पंधरावीस  विद्यार्थी योगासने करत होते. आम्हाला सुरुवातीला वाटले कुठल्यातरी स्वयंसेवी संस्थेचा कार्यकर्ता योगासने घेत असेल. सहज गप्पा माराव्यात म्हणून आम्ही शाळेच्या आवारात गेलो. आम्ही आल्याचे बघून त्या शिक्षकांनी त्यांचा  योगासनाचा  संच  पूर्ण केला आणि आमच्याशी बोलण्यासाठी पुढे आले. 

                   सिंगसर.... सिंगसर त्या शाळेत गणित-विज्ञानाचे अध्यापक. एवढ्या सकाळी मुलांबरोबर योगासने करत असल्याबद्दल त्यांचे सुरुवातीला अभिनंदन केले. मला तर सुरुवातीला हा  योगदिन सिंड्रोम वाटलं. 😊
 सिंगसर म्हणाले मी गेली काही वर्षे शाळेच्या जवळपास राहणारे जे विद्यार्थी सकाळी शाळेत येऊ शकतात त्यांच्याबरोबर नियमित योगासने करतो. सरांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी काही योगासने करून दाखवली . सरांनी कोणताही आधार न घेता शीर्षासन,  मयूरासन यासारखी  अवघड आसने देखील करून दाखवली. 

          गप्पा मारताना सर म्हणाले गेली अनेक वर्ष मी  घरी नियमित योगासनं करतो. पण एक दिवस असे वाटले की निसर्गतःच उत्तम शारीरिक कौशल्य असलेल्या या मुलांना मी गणित-विज्ञानाचे बरोबर योगासनेपण  शिकवायला हवी.  आपल्याला माहिती आहे की आज मणिपूर सारखे ईशान्य भारतातील छोटे राज्य  खेळामध्ये भारतासाठी सर्वाधिक पदके मिळवते.  हि कल्पना मनात येताच मी शाळेच्या मुख्याध्यापकांना योगासने शिकवण्यासाठी परवानगी मागितली.  तर ते म्हणाले तुमचा विषय वेगळा, शारीरिक शिक्षणाचे शिक्षक बघून घेतील योगासनांचे काय करायचे.  एकदोनदा मी रीतसर परवानगी काढायचा प्रयत्न केला.  पण शाळेच्या रचनेत हे करता येणे अवघड आहे असे दिसल्यानंतर मी विचार केला की सगळ्या शाळेसाठी किंवा वर्गासाठी हे जमणार नसेल तर आपण शाळेच्या आसपास राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत  बोलवू  आणि घरी योगासने करण्याच्या ऐवजी शाळेच्या आवारात  योगासने करू. इच्छा असणारे विद्यार्थी येतील. 

'मुझे जो जो चीज अच्छी आती हैं  वो मैं सिखाऊंगा' 

 मला जे चांगले येते ते माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायची इच्छा मला स्वस्थ बसू देत नव्हती त्यामुळे त्या दिवसापासून शाळेत सहज चालत येऊ शकतील अशी हि वीस-पंचवीस मुले आणि मी सकाळी शाळेच्या आवारात योगासने करतो आणि मैदानावर शारीरिक व्यायाम करतो. 

                 म्हटलं तर बिहारमधून अरुणाचलातील एका दुर्गम भागातील शासकीय शाळेतील अध्यापक.  पण त्याला आपल्या जवळ असलेले ज्ञान आणि कौशल्य ज्ञान मुलांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती अशी इच्छाच अध्यापकाची प्रेरणा आहे. 

              चांगला अध्यापक होण्यासाठी आपल्याला पाठपुस्तकापलीकडे जाऊन आपला विषय पोचवता आला पाहिजे. पण वर्गात आपण फक्त विषय शिक्षक म्हणून उभे नसतो एक व्यक्ती म्हणून आपल्या गुणदोषांसह उभे असतो. माझ्या व्यक्तिमत्त्वाचे विद्यार्थ्यांसमोर सर्वार्थाने प्रगटीकरण झाले पाहिजे हि इच्छा अध्यापकाची प्रेरणा आहे. 

        मला अनेक शिक्षक माहिती आहेत की ते उत्तम गायक असतात, वादक असतात, निवेदक असतात, छायाचित्रकार असतात पण शाळेत ते फक्त विषय शिक्षक असतात. असे कप्पे करून कसे राहता येत ? 

       ज्याला हे कप्पे जोडता येतात आणि आपल्या जवळ जे जे उत्तम आहे ते प्रकट करता येते त्याच्या बाबतीत दोन गोष्टी नक्की होतात एक आपल्या शिक्षकाला काहीतरी येते आणि आपले शिक्षक 'भारी' आहेत हा भाव विद्यार्थांच्या मनात तयार होतो. असा प्रभाव अध्यापकाची  परिणामकारकता नक्कीच वाढवतो. 

                                                                                                                     प्रशांत दिवेकर ,
                                                                                                                    ज्ञान प्रबोधीनी,पुणे
                                                                                                                     



अमर परांजपे यांच्या बरोबर पांगसू पास येथील सीमा स्तंभाजवळ



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सह वीर्यं करवावहै।

  सह वीर्यं करवावहै। गेल्या महिन्यात व्हॉट्स अॅपवर एक व्हिडिओ शेअर झाला. कोकणी जेवणातील पदार्थ त्या चित्रफितीत दाखवले होते. त्याची लिंक २००१ मध्ये अपरांत अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या मुलींना पाठवली आणि यातील कायकाय आठवते ? असं विचारल्यावर या गावात या काकूंकडे या सहलीत मी पहिल्यांदा सांदण खाल्ले होते , आम्ही सर्वांनी मिळून फणस सोलला होता , रात्री मांडवाखाली पोंक्षे सरांनी अंतुबर्वा वाचून दाखवला होता , दिलीप कुलकर्णींबरोबर देवराई पाहिली होती , एका बंदरात छोट्या बोटीने मोठ्या बोटीपर्यंत गेलो आणि मग मोठ्या बोटीवर दोरीची शिडी चढून गेलो होतो , खाजण पाहिले होते , सागरी गुहा पाहिली होती असे अनेक शब्द गोळा झाले. एक अध्यापक म्हणून मी आयोजित केलेली ती पहिलीच सहल होती. आज मागे वळून बघताना या सहलीच्या आयोजनात मी काय शिकलो ?   परिसर बघायचा कसा हे मला थोडेफार माहिती होते पण परिसर दाखवायचा कसा हे शिकलो.  दुसऱ्याला परिसराची ओळख करून देताना आपण परिसर अनुभवायचा कसा असतो हे शिकलो. एखादा उपक्रम फक्त शिक्षकांचा न राहता तो उपक्रम    विद्यार्थ्यांचा उपक्रम कसा होईल , नव्हे दोघांचा एकत्र शिकण्याचा उप

Task Instructions for PBL Guide Teachers : Enriching Skills Required for PBL

  Task Instructions for PBL Guide Teachers Thoughts on Enriching Skills Required for PBL Objective: To enrich the understanding of skill enrichment required for Project-Based Learning (PBL) by developing a comprehensive mind map and writing a short note. Steps: 1.     Review Shared Diagram: Begin by reviewing the diagram that lists a few skills required for project work, which has been shared with you along with activity instructions. 2.     Expand the Skill List: Add to the list of skills required for effective project work. 3.     Develop a Mind Map: Create a new mind map that represents the importance and scope of skill enrichment for PBL, Organize the skills into categories and show their relationships and interdependencies. 4.     Write a Short Note: ·        Based on your mind map, write a short note covering the following points: ·        Importance of Skill Enrichment to Enhance student engagement and PBL outcomes. ·        Ideas to Work with Students:

सह वीर्यं करवावहै।

  सह वीर्यं करवावहै।         Receiving a video on WhatsApp Chat is a frequent occurrence, but this particular one brought back a flood of cherished memories from one of the study tours back in 2001. The video was showcasing glimpses of Kokan and Konkani food, I couldn't resist sharing the video with students who had accompanied me on that trip. To my delight, they too remembered it vividly and reminisced their memories! Sir, I had eaten Sandan (idli/ cake like local sweet made by adding jackfruit juice) for the first time! It was a simple yet yummy flavourful dish that I had never tasted before! We all together peeled jackfruit! I enjoyed listening to Ponkshe sir narrate Antubarwa at night! A magical experience that I will never forget. Sir, for me the most exhilarating experience of the trip was riding a small boat to reach a large vessel in the harbour and climbing a rope ladder to board it. It was quite an adventure! I remember exploring the estuary, mangroves and t