Skip to main content

उस समय भी मजा आता था, अब भी मजा आता हैं।



            ... सात डोंगर आणि सात नद्या ओलांडून राजपुत्र राक्षसाच्या महालात पोचला आणि राक्षस बाहेर गेल्यावर त्याने पोपटाच्या डोळ्यातील राक्षसाचे प्राण हरण करून राजकन्येची सुटका केली.... परीकथेत हे वर्णन अनेकदा वाचलेले असते. पण असे एकात एक वसलेले सात डोंगर आणि सात नद्या हे वर्णन मला १९९९पर्यंत परीकथेत दुर्गमता सांगण्यासाठी केलेले वर्णन वाटत होते. मी पहिल्यांदा जेव्हा अरुणाचल प्रदेशला भेट दिली, तेव्हा परीकथेतील सात डोंगर, सात नद्या, सात दऱ्या हे प्रत्यक्षात एखाद्या प्रदेशात असू शकतात, याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. सात डोंगर, सात नद्या, सात दऱ्या ओलांडत प्रवास करणे किती अवघड, त्रासदायक आणि आव्हानात्मक असते, याचा अनुभव मी गेल्या वीस वर्षात अनेकदा त्या भागात प्रवास करताना घेतला आहे. ब्रह्मपुत्रेचा दर्या ओलांडून तिनसुकियाहून रोइंग, तेजूला पोचताना किंवा डोंगरामागून डोंगर ओलांडत तवांग, झीरोला पोचताना याचा अनुभव येतो. मला आठवतो २००५ मध्ये श्री. विजय स्वामींबरोबर केलेला मिश्मी टेकड्यांच्या प्रदेशातील रोइंग ते तेजू हा प्रवास. ते ६० किलोमीटरचे अंतर पार करायला सहा-सात तास लागले होते. अनेक नद्या ओलांडल्या. (काहीवेळा पात्राचा उतार बघून गाडी घातली , काहीवेळा चक्क गाडी बोटीवर चढवून...) वाटेतील एका नदीचे नाव पण मजेशीर होते ‘पगली’ अर्थात, तिला पाहिजे तशी वाहणारी.

           अरुणाचलमध्ये प्रवासाचे नियोजन करायचे म्हणजे सकाळी निघायचे आणि संध्याकाळी पोचू तेव्हा पोचू. संध्याकाळी इच्छित ठिकाणी पोचलो तर छान झाला प्रवास. एकदा मी आणि विवेकराव पोंक्षे सर तिनसुकियाहून रोइंगला जाण्यासाठी ब्रह्मपुत्रा ओलांडण्यासाठी फेरी बोट लागतात, त्या घाटावर तीन दिवस गेलो पण नदी ओलांडून पलीकडे अरुणाचलला जाता आले नाही.  एकंदरीत अरुणाचलातील प्रवास म्हणजे अनिश्चितता, काळजी आणि आव्हान. पण गेल्या पाच वर्षात चित्र झपाट्याने बदलते आहे. ब्रम्हपुत्रेवर नवीन पूल झाले आहेत आणि बोर्डर रोड ऑर्गनायझेशन ( BRO) सुंदर रस्ते बांधत आहेत.

                दिब्रुगड ते ताफ्रागांव हा प्रवास. ज्या प्रवासाला किमान एक दिवस लागायचा, तो प्रवास दोन वर्षांपूर्वी मी, ज्ञान प्रबोधिनीच्या हराळी केंद्राचे केंद्रप्रमुख अभिजित कापरे आणि विवेकानंद केंद्र विद्यालयाचे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर पी.के. पांडे सरांनी चार तासात केला. वाटेत प्रवासात पांडे सर गप्पांमध्ये त्यांचे विवेकानंद केंद्र विद्यालयातील आणि अरुणाचल प्रदेशातील अनुभव सांगत होते. पांडे सर गेली पस्तीस वर्षे विवेकानंद केंद्राच्या  अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागातील विद्यालयामध्ये अध्यापन करत आहेत. अध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. प्रवासातील  गप्पांमध्ये  त्यांनी त्यांचे असंख्य अनुभव आमच्याबरोबर शेअर केले. अरुणाचलातील दुर्गम भागातील प्रवास, दरडी कोसळून रस्ते बंद होणे, त्यामुळे शाळेला होणारा अन्न आणि वस्तू पुरवठा विस्कळीत होणे याबद्दल ते बोलत होते. तसेच या निवासी शाळात उत्तर भारतातून एवढ्या दूर येऊन सहकुटुंब निवास करणे, सहकुटुंब राहताना येणाऱ्या अडचणी, त्यातील आव्हाने, संपर्क आणि प्रवासाबद्दल बोलताना पांडे सरांनी बरेच अनुभव सांगितले. पांडे सर  विवेकानंद केंद्र विद्यालय, निउसा येथे अध्यापन करत होते तेव्हाचा अनुभव सांगताना ते म्हणाले, "माझा मुलगा उच्च शिक्षणासाठी बाहेर होता. त्याला एक फोन करण्यासाठी सकाळी शाळेतून निघून चालत निउसा गावात यायचे ,सकाळची बस पकडायची, तीन तासांचा प्रवास करून लोंगडींग या मोठ्या गावात यायचे, STD बूथ मधून फोन करून  पाचदहा  मिनिटे मुलाशी बोलायचं, तासाभराने जाणारी परतीची गाडी पकडायची, परत तीन तासाचा प्रवास आणि चालत शाळेत पोचायचे. पाच मिनिटं मुलाबरोबर फोनवर बोलण्यासाठी संपूर्ण दिवस खर्च करावा लागायचा"... पांडेजींचे अनुभव ऐकत संध्याकाळी दिब्रुगडहून निघालेलो आम्ही रात्री मुक्कामी ताफ्रागांवला पोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी विवेकानंद केंद्र विद्यालय, ताफ्रागांवची शाळा बघून रोइंगाला निघालो. बोर्डर रोड ऑर्गनायझेशनने बांधलेल्या सुंदर तुळतुळीत रस्त्याने तेजू ते रोइंग प्रवास दीड तासात पूर्ण केला. जे अंतर पार करायला पंधरा वर्षांपूर्वी दिवस लागला होता, तो प्रवास यावेळी दीड तासात केला.
           
तुळतुळीत रस्त्याने प्रवास करताना पांडे सरांना विचारले, ‘सर,आता अरुणाचलात राहताना छान वाटत असेल ना !  मोबाईल फोन आले, छान रस्ते झाले.’ नेहमीप्रमाणे प्रसन्न हसून पांडे सरांनी माझ्याकडे बघितले आणि म्हणाले, ‘प्रशांतजी उस समय भी मजा आता था अब भी मजा आता हैं।'

    खरंच, विवेकानंद केंद्राच्या शाळांमधील असे असंख्य प्रसंग आणि त्यांच्या न नोंदवलेल्या  कथा !!   
             विवेकांनंद केंद्राचे जीवनव्रती कार्यकर्ते असोत वा विवेकानंद केंद्र विद्यालयातील अध्यापक असोत त्यांच्या बरोबरच्या गप्पांच्या ओघात असे न नोंदवलेले प्रसंग, कथा अचानक पुढे येतात आणि    त्यांच्या कर्मयोगाचे अचानक अवचित दर्शन होते .









Comments

  1. खूपच छान प्रशांत...
    त्यावेळची मजा मी घेऊ शकलो असतो तर सरांना सुद्धा खूप आनंद झाला असता.
    जानेवारी फेरीमध्ये अजून प्रदेश समजला.

    ReplyDelete
  2. सियांग नदीच्या गार वाऱ्यात दिब्रुगड (सोनोरी घाट) ते पासीघाट (निमोती घाट) चार तासांचा पहिलाच प्रवास आठवला.

    ReplyDelete
  3. प्रशांत, फारच सुरेख वर्णन.अजून माझा आणि अरुणाचल प्रदेशाचा योग आलेला नाही पण हे वाचून लवकरच योग आणला पाहिजे असे आतून वाटायला लागले आहे.

    ReplyDelete
  4. 2015 मध्ये एका दिवसात इटानगर ते दिब्रूगड आणि पुढे तिनसुखीय मार्गे जयरामपूर असा आपण केलेला प्रवास आठवला. त्यावेळी ब्राह्मपुत्रेवर पूल तयार होत होता. ऊस समय की मजा ले चुके है.... आता परत एकदा जाऊन इस समय की मजा लेंनी चाहीये...असं वाटायला लागलंय

    ReplyDelete
  5. कोणालाही हेवा वाटावा असा अनुभव आहे सर हा!

    ReplyDelete
    Replies
    1. परिस्थितीत बदल ऐकून खूप आनंद झाला आता संत्री, अननस, आले यांना मार्केट मिळेल पण वाईट गोष्टी पण घुस तील त्याला कुंपण घालावे लागेल विकास संस्कृती मधून यावर खूप भर. द्यावा लागेल तुमच्या प्रवासाचा पण नक्कीच प्रभाव झाला असेल आपल्याला कंबर कसून कामाला लागले पाहिजे
      प्रा थ ना

      Delete
  6. छान अनुभव 👌

    ReplyDelete
  7. आपण केलेले वर्णन वाचून प्रत्यक्ष तिथली परिस्थिती डोळ्यासमोरून गेल्यासारखे वाटले... धन्य ते विवेक पोंक्षे सर आणि पांडे सर आणि असेच सर्व जीवनव्रती कार्यकर्ते. माझा प्रणाम🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आ. कै. उषाताईंबद्दल .....

  आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये   एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल ,   थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी   प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव , उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , " आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक , सहली , शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत   आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा. त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलाप...

Nation in Image: Symbols that Shape Nations

                                                          Symbols that Shape Nations This activity introduces students to how nations use visual symbols and personifications to express identity, unity, and political values. By examining global examples and comparing them with Abanindranath Tagore’s Bharat Mata, learners explore how imagery shapes nationalism and deepen their understanding of the Bharatiya concept of Rāṣṭra. Identify images and by using references complete the table   (Support Independent Learning, Comparison & analysis) 2.  Compare the above images with Abanindranath Tagore’s image of Bharat Mata. How does it reflect Indian values? (Analysis & synthesis) 3.  How does the practice of personifying nations—often through female figures—shape our understandin...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...